शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

काश्मीरमध्ये 500 रुपयांसाठी तरुण करत आहेत जवानांवर दगडफेक

By admin | Updated: July 15, 2016 12:06 IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी वातावरण तयार करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी एका वर्षात तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 15 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी वातावरण तयार करण्यासाठी दहशतवादी संघटनांनी एका वर्षात तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. सुरक्षा जवानांवर दगडफेक करण्यासाठी तरुणांना आपलं जाळ्यात ओढलं जात असून त्यांना 500 रुपये दिले जात आहेत. फक्त 500 रुपयांसाठी हे तरुण दगडफेक करत आहेत, याची कबुली स्वत: दगडफेक करणा-या एका तरुणाने दिली आहे. 
 
'मेल टुडे' वृत्तपत्राने यासंबंधी वृत्त दिलं असून अहवाल प्रसिद्ध केला आहे. गुप्तचर खात्याच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार काश्मीर खो-यात दहशतवादाला बढावा देण्यासाठी दहशतवादी संघटनांनी 100 कोटी रुपये खर्च केले आहेत. प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आपल्या एजंटच्या मार्फेत पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये फंड वाटप करत आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सध्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या सय्यद सलाहुद्दीन आणि जमात-उल-दावाचा प्रमुख हाफिज सईदचं नियंत्रण आहे.
 
सय्यद सलाहुद्दीन आणि हाफिज सईदच्या हाती सूत्र
हिज्बुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर काश्मीर खो-यात अशांती आणि हिंसा पसरवण्याची जबाबदारी सय्यद सलाहुद्दीन आणि हाफिज सईदवर देण्यात आल्याची माहितीही गुप्तचर खात्याच्या सुत्रांकडून मिळालं असल्याचं अहवालात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. बुऱ्हाण वाणीला इंडियन मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय म्हटलं जायचं. सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांना शस्त्र उचलण्याचं तसंच हिंसेचं आवाहन करत असे. सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत बुऱ्हाण वाणीचा खातमा करण्यात आला असून त्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उसळला आहे.
 
दहशतवाद पसरवण्यासाठी मिळणा-या पैशांचा वापर शस्र खरेदीसाठी आणि दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये पाठवण्यासाठी केला जात आहे. गेल्या काही वर्षात दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणा-या स्थानिक तरुणांची संख्या वाढली आहे. काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याची जबाबदारी स्थानिकांवर देण्यात आली आहे. काश्मीरमधील 91 नागरिक ही जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती देण्यात आली आहे. 
 
बुऱ्हाण वाणीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी तात्काळ 4 हिजबुल कमांडरची नियुक्ती केली आहे. बुरहान वनीच्या मृत्यूनंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हिंसेत आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या ध्वजात
सुरक्षा दलांनी बुऱ्हान वणीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यानंतर दफनविधीसाठी त्राल या त्याच्या मूळ गावी आणण्यात आला. दफनविधीला गर्दी होऊ नये यासाठी हमरस्ते बंद करण्यात आले होते तरी हजारो लोक डोंगरवाटांनी व पायवाटांनी तेथे जमा झाले. १९९० च्या काश्मीर खोऱ्यातील उद्रेकानंतर पोलिसी कारवाईत मारल्या गेलेल्या कोणाही बंडखोराच्या अंत्ययात्रेस जमलेला हा सर्वात मोठा जनसमुदाय होता, असे मानले जात आहे.
 
विशेष म्हणजे काश्मीरच्या आझादीसाठी वयाच्या १५ व्या वर्षी हिजबूल मुजाहिदीनमध्ये सामील झालेल्या बुऱ्हानचा मृतदेह पाकच्या राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आला होता. त्याशिवाय शेकडो लोक उघडपणे पाकिस्तानचा ध्वज फडकावित होते. ‘तुम कितने बुऱ्हान मारोंगे, हर घरसे बुऱ्हान निकलेगा’, अशा घोषणा देण्यात येत होत्या.