शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:11 IST

कार्यालयात कमी उपस्थिती

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी सोमवारी काश्मीरमधील बहुतांश भागांत हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. श्रीनगर शहरातील काही भागांत मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. काश्मीरमध्ये सरकारी वगळता बाकीच्या शाळा, बाजारपेठा अद्यापही बंद आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू झालेली नाही.श्रीनगरच्या लाल चौकात सुरक्षा दलांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातकाही ठिकाणी रविवारी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली.

लँडलाईन मात्र काही ठिकाणी सुरू होती. काश्मीरमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पठणास परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या संख्येने लोक जमल्यास हिंसाचार होऊ शकतो हे ध्यानात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांना चिंताजिनिव्हा : विशेष दर्जा रद्द केल्यानंतर कोणतीही गडबड होऊ नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे तेथील दैैनंदिन जनजीवन सुरळीतपणे चालण्यास अडथळे येत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जीवनावश्यक गरजा भागविता याव्यात यासाठी हे निर्बंध शिथिल करावेत असे त्यांनी सोमवारी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या ४२व्या अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या की, भारत व पाकिस्तानने काश्मीरी लोकांच्या मानवी हक्कांची जपणूक करावी. काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमधील स्थितीबद्दलचे अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या कार्यालयाकडून मला नेहमी मिळत असतात. काश्मीरमध्ये इंटरनेटसेवा बंद असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्त्यांपैैकी काही जण अटकेत आहे. ही सर्व चिंताजनक स्थिती आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370