शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:11 IST

कार्यालयात कमी उपस्थिती

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी सोमवारी काश्मीरमधील बहुतांश भागांत हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. श्रीनगर शहरातील काही भागांत मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. काश्मीरमध्ये सरकारी वगळता बाकीच्या शाळा, बाजारपेठा अद्यापही बंद आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू झालेली नाही.श्रीनगरच्या लाल चौकात सुरक्षा दलांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातकाही ठिकाणी रविवारी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली.

लँडलाईन मात्र काही ठिकाणी सुरू होती. काश्मीरमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पठणास परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या संख्येने लोक जमल्यास हिंसाचार होऊ शकतो हे ध्यानात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांना चिंताजिनिव्हा : विशेष दर्जा रद्द केल्यानंतर कोणतीही गडबड होऊ नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे तेथील दैैनंदिन जनजीवन सुरळीतपणे चालण्यास अडथळे येत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जीवनावश्यक गरजा भागविता याव्यात यासाठी हे निर्बंध शिथिल करावेत असे त्यांनी सोमवारी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या ४२व्या अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या की, भारत व पाकिस्तानने काश्मीरी लोकांच्या मानवी हक्कांची जपणूक करावी. काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमधील स्थितीबद्दलचे अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या कार्यालयाकडून मला नेहमी मिळत असतात. काश्मीरमध्ये इंटरनेटसेवा बंद असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्त्यांपैैकी काही जण अटकेत आहे. ही सर्व चिंताजनक स्थिती आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370