शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 03:11 IST

कार्यालयात कमी उपस्थिती

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी सोमवारी काश्मीरमधील बहुतांश भागांत हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. श्रीनगर शहरातील काही भागांत मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. काश्मीरमध्ये सरकारी वगळता बाकीच्या शाळा, बाजारपेठा अद्यापही बंद आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू झालेली नाही.श्रीनगरच्या लाल चौकात सुरक्षा दलांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातकाही ठिकाणी रविवारी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली.

लँडलाईन मात्र काही ठिकाणी सुरू होती. काश्मीरमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पठणास परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या संख्येने लोक जमल्यास हिंसाचार होऊ शकतो हे ध्यानात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांना चिंताजिनिव्हा : विशेष दर्जा रद्द केल्यानंतर कोणतीही गडबड होऊ नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे तेथील दैैनंदिन जनजीवन सुरळीतपणे चालण्यास अडथळे येत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जीवनावश्यक गरजा भागविता याव्यात यासाठी हे निर्बंध शिथिल करावेत असे त्यांनी सोमवारी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या ४२व्या अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या की, भारत व पाकिस्तानने काश्मीरी लोकांच्या मानवी हक्कांची जपणूक करावी. काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमधील स्थितीबद्दलचे अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या कार्यालयाकडून मला नेहमी मिळत असतात. काश्मीरमध्ये इंटरनेटसेवा बंद असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्त्यांपैैकी काही जण अटकेत आहे. ही सर्व चिंताजनक स्थिती आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370