शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:13 IST

पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रत्युत्तर देताना फारुख अब्दुल्ला यांनी गंभीर आरोप केला आहे.

Farooq Abdullah: जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि इथल्या लोकांनी कधीही दहशतवादाचे समर्थन केलेलं नाही, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. यावेळी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या विधानावरही फारुख अब्दुल्लांनी भाष्य केले. मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर दिले तर ते चांगले होणार नाही, असे अब्दुल्ला म्हणाले. यावेळी मेहबूबा मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जात असत असाही आरोप फारुख अब्दुल्लांनी केला आहे.

स्थानिक पाठिंब्याशिवाय पहलगाम दहशतवादी हल्ला होऊ शकला नसता. कारण दहशतवादी तिथे कसे पोहोचले, हा प्रश्न अजूनही कायम आहे. कोणीतरी स्थानिकांनी त्याला मदत केली असावी, असं फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. त्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी आक्षेप घेत अब्दुल्ला यांच्या अशा विधानामुळे देशाच्या इतर भागात राहणाऱ्या काश्मिरी लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो, असं म्हटलं होतं. त्यावर आता फारुख अब्दुल्लांनी मुफ्तींवर गंभीर आरोप केला आहे.

"मेहबूबा मुफ्ती जे काही बोलतात त्याला मी उत्तर दिले तर ते चांगले दिसणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की अशा गोष्टी बोलू नका. ३४ वर्षे झाली. हे कोणी सुरू केले? बाहेर जाणारे आणि परत येणारे ते लोक कोण होते? आमच्या पंडित बांधवांना येथून हाकलून लावणारे कोण होते? याचे उत्तर द्या. त्या (मेहबूबा मुफ्ती) अशा ठिकाणी जायच्या जिथे मी जाऊ शकत नव्हतो. त्या दहशतवाद्यांच्या घरी जायच्या. आम्ही कधीही दहशतवादाशी संबंधित नव्हतो, पाकिस्तानी नव्हतो, आताही नाही आणि कधीही राहणार नाही. आम्ही भारताचा अविभाज्य भाग आहोत आणि काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. अमरनाथजी येथे आहेत आणि ते आमचे रक्षण करतील," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले.

"मला शहीद पर्यटकांच्या कुटुंबियांना सांगायचे आहे की आम्हीही तुमच्याइतकेच रडलो आहे. मानवतेचा नाश करणारे असे क्रूर लोक अजूनही अस्तित्वात आहेत हे विचार करून आम्हालाही झोप येत नव्हती. या हल्ल्याचा निश्चितच बदला घेतला जाईल. दहशतवाद्यांना वाटते की ते पहलगाम हल्ल्यात जिंकतील पण ते कधीही जिंकणार नाहीत," असेही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

मी म्हटलं होतं, मौलाना अझहरला सोडू नका

"१९९९ मध्ये जेव्हा भारताने मौलाना मसूद अझहरला सोडले तेव्हा मी त्याला सोडू नका असे सांगितले होते, पण कोणीही माझे ऐकले नाही. अझहरला काश्मीर माहिती आहे. तो आता यशस्वी झाला आहे आणि त्याने आपले रस्ते तयार केले आहेत. पहलगाम हल्ल्यातही त्याचा हात असू शकतो कोणाला माहिती, असेही फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीर