शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Jammu Kashmir : काश्मीर, लडाख मोठी पर्यटनस्थळे होऊ शकतात, पण...; मोदींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले.

नवी दिली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या भागांमध्ये देशातील सर्वाधिक पर्यटक खेचून आणण्याची क्षमता आहे. काश्मीरमध्ये एक काळ असा होता, तिथे बॉलिवूडच्या सिनेमांचे शूटिंग होत होते. मात्र, मागच्या काळात हे क्वचितच घडले असेल. यामुळे काश्मीरचे पर्यटनही घसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे. 

यावेळी मोदी यांनी लडाखमध्ये अडव्हेंचर टुरिझमला मोठा वाव असल्याचे सांगितले. कलम 370 मुळे या भागचे मोठे नुकसान झाले. काश्मीर हे बॉलिवूडच्या सिनेमा निर्मात्यांसाठी आवडीचे ठिकाण होते. मात्र, तेथे नंतर कमी सिनेमे बनले. मी विश्वास देतो की, काश्मीरमध्ये पुढील काळात आंतरराष्ट्रीय सिनेमांचेही चित्रिकरण होईल, असे मोदी यांनी सांगितले. 

ईदचा सण जवळच आहे. त्यामुळे सरकार जम्मू काश्मीरमध्ये काळजी घेत आहे की, ईदच्या काळात तेथील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे मी आभार मानत आहे. तेथील परिस्थिती सांभाळणे कठीण असतानाही तेथील प्रशासन ज्या प्रकारे प्रयत्न करत आहे, ती प्रशंसनीय असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

यावेळी मोदींनी जम्मू काश्मीरच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी राजकीय घराण्यांमुळे तरुणाई पुढे येऊ शकली नाही. पण आता हेच तरुण विकासाच्या प्रवाहात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी