शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

Jammu Kashmir : काश्मीर, लडाख मोठी पर्यटनस्थळे होऊ शकतात, पण...; मोदींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले.

नवी दिली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख या भागांमध्ये देशातील सर्वाधिक पर्यटक खेचून आणण्याची क्षमता आहे. काश्मीरमध्ये एक काळ असा होता, तिथे बॉलिवूडच्या सिनेमांचे शूटिंग होत होते. मात्र, मागच्या काळात हे क्वचितच घडले असेल. यामुळे काश्मीरचे पर्यटनही घसरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याबाबतचे फायदे सांगितले. देशाची सर्वोच्च संसद कायदे बनवत होती. मात्र, कल्पना करू शकत नाही की हे कायदे देशाच्या एका भागाला लागूच होत नव्हते. याचप्रमाणे आधीच्या आणि आपल्या सरकारने राबविलेल्या योजनाही जम्मू काश्मीरला लागू होत नव्हती. येथील नागरिक यामुळेच विकासापासून वंचित राहत होते. शिक्षणातील आरक्षण, नोकऱ्या, विविध योजना या नागरिकांना मिळत नव्हत्या. यामुळे हे कलम रद्द झाल्याने या जनतेचा फायदाच होणार आहे. 

यावेळी मोदी यांनी लडाखमध्ये अडव्हेंचर टुरिझमला मोठा वाव असल्याचे सांगितले. कलम 370 मुळे या भागचे मोठे नुकसान झाले. काश्मीर हे बॉलिवूडच्या सिनेमा निर्मात्यांसाठी आवडीचे ठिकाण होते. मात्र, तेथे नंतर कमी सिनेमे बनले. मी विश्वास देतो की, काश्मीरमध्ये पुढील काळात आंतरराष्ट्रीय सिनेमांचेही चित्रिकरण होईल, असे मोदी यांनी सांगितले. 

ईदचा सण जवळच आहे. त्यामुळे सरकार जम्मू काश्मीरमध्ये काळजी घेत आहे की, ईदच्या काळात तेथील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये. तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचे मी आभार मानत आहे. तेथील परिस्थिती सांभाळणे कठीण असतानाही तेथील प्रशासन ज्या प्रकारे प्रयत्न करत आहे, ती प्रशंसनीय असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

यावेळी मोदींनी जम्मू काश्मीरच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. त्यांनी राजकीय घराण्यांमुळे तरुणाई पुढे येऊ शकली नाही. पण आता हेच तरुण विकासाच्या प्रवाहात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदी