शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

काश्मीरच्या न्यायाधीशांना नव्याने शपथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:01 IST

जम्मू काश्मीरमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेनुसार पदाची शपथ नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याला भारतीय राज्यघटना पूर्णांशाने लागू करण्याचा आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या आठवड्यात काढल्याने तेथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेनुसार पदाची शपथ नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे.राष्ट्रपतींचा हा नवा आदेश लागू होण्याच्या आधीपर्यंत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका व तद्नुषंगिक बाबींना त्या राज्याच्या राज्यघटनेच्या तरतुदी लागू होत्या. त्यामुळे तेथील उच्च न्यायालयातील विद्यमान मुख्य न्यायाधीश व अन्य आठ न्यायाधीशांना तेथील राज्यघटनेनुसार पदाची शपथ दिलेली आहे.त्या राज्यघटनेच्या पाचव्या परिशिष्टात शपथेचा जो मसूदा आहे त्यानुसार ती शपथ फक्त जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची आहे.आता तेथे भारतीय राज्यघटना लागू झाल्याने या न्यायाधीशांना त्यानुसार नव्याने शपथ घ्यावी लागेल. याचे कारण असे की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१९अन्वये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते.आतापर्यंतची तरतूदयाआधी काश्मीरला विशेष दर्जा देणारा जो आदेश राष्ट्रपतींनी १९५६ मध्ये काढला होता त्यात उच्च न्यायालयाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील उच्च न्यायालयासंबंधीच्या सर्व तरतुदींमधून (अनुच्छेद २१७ ते २२७) जम्मू-काश्मीरला वगळले होते.गेली ६३ वर्षे तेथील उच्च न्यायालयातील नेमणुका, न्यायाधीशांचा शपथविधी वगैरे त्या राज्याच्या राज्यघटनेनुसारच चालले होते.म्हणजेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याची एकीकडे ग्वाही दिली जात असूनही तेथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मात्र भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची बांधिलकी न स्वीकारता काम करत होते.या परिस्थितीवर कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?नव्याने शपथ दिली नाही तर विचित्र घटनात्मक परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा दोन्ही राज्यघटनांमधील परस्पर विरोधाचा मुद्दा येईल तेव्हा या न्यायाधीशांना भारतीय राज्यघटना शीरोधार्य मानण्याचे बंधन असणार नाही.राष्ट्रपतींच्या नव्या आदेशानंतर ही त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर काही हालचाली झाल्याचे दिसले नाही. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते पुन्हा शपथ देण्याविषयी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीश व मुख्य न्यायाधीशांना सूचित करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर