शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

काश्मीरच्या न्यायाधीशांना नव्याने शपथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 04:01 IST

जम्मू काश्मीरमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेनुसार पदाची शपथ नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्या राज्याला भारतीय राज्यघटना पूर्णांशाने लागू करण्याचा आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या आठवड्यात काढल्याने तेथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीशांना भारतीय राज्यघटनेनुसार पदाची शपथ नव्याने देण्याची गरज निर्माण झाली आहे.राष्ट्रपतींचा हा नवा आदेश लागू होण्याच्या आधीपर्यंत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका व तद्नुषंगिक बाबींना त्या राज्याच्या राज्यघटनेच्या तरतुदी लागू होत्या. त्यामुळे तेथील उच्च न्यायालयातील विद्यमान मुख्य न्यायाधीश व अन्य आठ न्यायाधीशांना तेथील राज्यघटनेनुसार पदाची शपथ दिलेली आहे.त्या राज्यघटनेच्या पाचव्या परिशिष्टात शपथेचा जो मसूदा आहे त्यानुसार ती शपथ फक्त जम्मू-काश्मीरच्या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची आहे.आता तेथे भारतीय राज्यघटना लागू झाल्याने या न्यायाधीशांना त्यानुसार नव्याने शपथ घ्यावी लागेल. याचे कारण असे की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१९अन्वये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते.आतापर्यंतची तरतूदयाआधी काश्मीरला विशेष दर्जा देणारा जो आदेश राष्ट्रपतींनी १९५६ मध्ये काढला होता त्यात उच्च न्यायालयाशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील उच्च न्यायालयासंबंधीच्या सर्व तरतुदींमधून (अनुच्छेद २१७ ते २२७) जम्मू-काश्मीरला वगळले होते.गेली ६३ वर्षे तेथील उच्च न्यायालयातील नेमणुका, न्यायाधीशांचा शपथविधी वगैरे त्या राज्याच्या राज्यघटनेनुसारच चालले होते.म्हणजेच जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याची एकीकडे ग्वाही दिली जात असूनही तेथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मात्र भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची बांधिलकी न स्वीकारता काम करत होते.या परिस्थितीवर कायदेतज्ज्ञ काय म्हणतात?नव्याने शपथ दिली नाही तर विचित्र घटनात्मक परिस्थिती निर्माण होईल. जेव्हा दोन्ही राज्यघटनांमधील परस्पर विरोधाचा मुद्दा येईल तेव्हा या न्यायाधीशांना भारतीय राज्यघटना शीरोधार्य मानण्याचे बंधन असणार नाही.राष्ट्रपतींच्या नव्या आदेशानंतर ही त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर काही हालचाली झाल्याचे दिसले नाही. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते पुन्हा शपथ देण्याविषयी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीश व मुख्य न्यायाधीशांना सूचित करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयJammu Kashmirजम्मू-काश्मीर