शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 10:48 IST

जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल.

ठळक मुद्देअनेक उद्योगपतींनी काश्मीरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला गती मिळेलहा निर्णय घेताना खूप विचारविनिमय केला गेला.

नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय खूप विचारविनिमय करुन घेतल्याचं सांगितले. यामुळे देशातील दुसऱ्या राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकासाला गती मिळेल. राज्यात रोजगार, गुंतवणूक वाढेल स्थानिकांची प्रगती होईल अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केली आहे. 

या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजाआड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल असं त्यांनी सांगितले. 

गुंतवणूकीसाठी काही परिस्थितीही अशी लागते की, स्थिर बाजार, कायदा-सुव्यवस्था सुरळीत लागतो. कलम 370 हटवल्यानंतर हे सर्व सुनिश्चित केलं जाईल. जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल. अशा निर्णयामुळे एक आर्थिक घडी राज्याला बसेल ज्यामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले येणाऱ्या काळात पाहायला मिळतील अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 

युवकांना शैक्षणिक संधी प्राप्त होऊन या परिसरात त्यांना रोजगार निर्माण केला जाईल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत आयटीआय, आयआयएम, एम्स सारख्या क्षेत्रामुळे युवकांना शैक्षणिक तसेच रोजगार प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल. जास्तीत जास्त सुविधा जम्मू काश्मीरमध्ये निर्माण करणे हे सरकारचं प्राधान्य असेल. राज्याचा विकास साधण्यासाठी रस्ते, नवीन रेल्वे मार्ग, एअरपोर्ट असे विकासाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या राज्याचा विकास झाल्यास त्याला देश आणि परदेशाशी जोडण्यास मदत होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मागील सोमवारी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचं देशभरातून नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी