शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

कलम 370 हटवण्यापूर्वी मोदींनी असा आखला होता 'प्लॅन'; काय होतं त्यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 10:48 IST

जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल.

ठळक मुद्देअनेक उद्योगपतींनी काश्मीरात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. कलम 370 हटवल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला गती मिळेलहा निर्णय घेताना खूप विचारविनिमय केला गेला.

नवी दिल्ली - कलम 370 हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मू काश्मीरच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निर्णय खूप विचारविनिमय करुन घेतल्याचं सांगितले. यामुळे देशातील दुसऱ्या राज्यांप्रमाणे काश्मीरचा विकासाला गती मिळेल. राज्यात रोजगार, गुंतवणूक वाढेल स्थानिकांची प्रगती होईल अशा शब्दात मोदींनी भावना व्यक्त केली आहे. 

या मुलाखतीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी या निर्णयासाठी भरपूर आश्वासक आहे. अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजाआड होऊ शकत नाही. खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतात. गुंतवणूकीमुळे रोजगार, स्थानिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकेल असं त्यांनी सांगितले. 

गुंतवणूकीसाठी काही परिस्थितीही अशी लागते की, स्थिर बाजार, कायदा-सुव्यवस्था सुरळीत लागतो. कलम 370 हटवल्यानंतर हे सर्व सुनिश्चित केलं जाईल. जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल. अशा निर्णयामुळे एक आर्थिक घडी राज्याला बसेल ज्यामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले येणाऱ्या काळात पाहायला मिळतील अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 

युवकांना शैक्षणिक संधी प्राप्त होऊन या परिसरात त्यांना रोजगार निर्माण केला जाईल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत आयटीआय, आयआयएम, एम्स सारख्या क्षेत्रामुळे युवकांना शैक्षणिक तसेच रोजगार प्राप्त होण्यासाठी मदत मिळेल. जास्तीत जास्त सुविधा जम्मू काश्मीरमध्ये निर्माण करणे हे सरकारचं प्राधान्य असेल. राज्याचा विकास साधण्यासाठी रस्ते, नवीन रेल्वे मार्ग, एअरपोर्ट असे विकासाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या राज्याचा विकास झाल्यास त्याला देश आणि परदेशाशी जोडण्यास मदत होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मागील सोमवारी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचं देशभरातून नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी