शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काश्मीरमध्ये EVM वर काँग्रेसच बटणच दाबल जात नाही, ओमर अब्दुलांचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:08 IST

आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान ठप्प झालं असून यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत.

श्रीनगर - लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. देशातील 91 लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह नागरिकांकडून दिसून येत आहे. मात्र, काश्मीरच्या पुँछ येथील ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ईव्हीएमवरील काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटणंच दाबल जात नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट करुन आपली नाराजी दर्शवली आहे. अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामधील व्यक्तीकडून ईव्हीएमच्या घोळाबाबत सांगण्यात येत आहे. तसेच ईव्हीएमचे एक बटन दाबले जात नसल्याचे या व्यक्तीकडून सांगितले जात आहे. हाताचे बटण काम करण्यात येत नाही, असेही ही व्यक्ती मान्य करत आहे. याबाबत मतदारांनीही नाराजी दर्शवली आहे.   

आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान ठप्प झालं असून यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महाराष्टातील विदर्भातही अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.देशात पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 91 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान