शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकचा फॉर्म्युला भाजपाला 'या' चार राज्यांमध्ये भोवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 19:47 IST

भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.

मुंबई - सर्वात जास्त आमदार असलेल्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी पाचारण करण्याचे कर्नाटकातील राज्यपाल वजुभाई वाला यांचे धोरण भाजपला तेथे सत्तादायी ठरले आहे.  मात्र तेथे फायद्याचे ठरलेले धोरण आता देशातील तीन राज्यांमध्ये भोवण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या राज्यपालांनी जे केले तुम्हीही करा, त्याच न्यायाने राज्याच्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापन करण्याची संधी द्या, अशी मागणी गोवा, बिहार, मणिपूर, मेघालय या चार राज्यांमधील विरोधी पक्षांनी तेथील राज्यपालांकडे केली आहे.  त्यामुळे भाजपा आणि मित्रपक्षांच्या चार राज्यांमधील सत्तेला धोका निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्या पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी २४३ सदस्यांच्या विधानसभेत ८० आमदार असल्याने आपल्याला सत्तास्थापनेची संधी मिळावी अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या सहकार्याने तेथे बहुमत सिद्ध करण्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यपालांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता त्यांना भेटीसाठी वेळ दिली आहे. सध्या तेथे भाजपाच्या पाठिंब्यावर नितिशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त)चे सरकार आहे.

गोव्यात तर काँग्रेसच्या तोंडाशी असलेला घास भाजपाने हिरावून घेतला होता. काँग्रेसच्या गोव्याच्या प्रभारी चेल्लाकुमार शुक्रवारी त्या राज्यात पोहचत असून राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी संधी देण्याची मागणी करणार आहेत.

मणिपूरमध्येही अशीच राजकीय हालचाल सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंह यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेची मागणी केली आहे. मेघालयमध्येही माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनीही अशीच मागणी केल्याने भाजपाचा सहभाग असलेल्या तेथील सरकारसमोर नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८BJPभाजपा