शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्नाटकात काँग्रेसने २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलं होतं, लोकांनी आतापासून बिल भरण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:40 IST

काँग्रेसने मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही काँग्रेसला मतदान केले आणि काँग्रेस जिंकली, ते मोफत वीज घेण्याचे हक्कदार झाले, असं लोकांच म्हणणं आहे.

कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली असली तरी सरकार अजुनही स्थापन व्हायचे आहे. त्याचबरोबर काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणीही लोकांकडून होऊ लागली आहे. आपले सरकार आल्यास लोकांना २०० युनिट वीज मोफत दिली जाईल, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. कर्नाटकात सरकार स्थापन व्हायचे असूनही लोकांनी वीजबिल भरण्यास नकार दिला आहे.

पेट्रोल पंपावर झिरो दिसण्यापेक्षा 'ही' गोष्ट महत्त्वाची आहे, त्यावर लक्ष नाही ठेवल्यास होईल तोटा

कर्नाटकातील कोप्पल, कलबुर्गी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील काही गावांतील लोकांनी वीज बिल भरण्यास नकार दिला आहे. कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जनतेला २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. अशा स्थितीत वीज विभागाचे कर्मचारी वीज बिल घेऊन काही गावात पोहोचले असता, लोकांनी बिले भरण्यास नकार दिला.

लोक म्हणतात की, काँग्रेसने मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते आणि आम्ही काँग्रेसला मतदान केले आणि काँग्रेस जिंकली, ते मोफत वीज देण्याचे हक्कदार झाले. वीजबिल भरणार नसल्यामुळे त्यांच्याकडे वीजबिल घेऊन येऊ नका, असे लोकांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. आता काहीही झाले तरी आम्ही बिल भरणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

पाच हमीभाव योजना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जाहीर करण्यात आली होती. त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता या पाच हमी योजना राबविण्यासाठी काँग्रेस सरकारला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. खरे तर कर्नाटकातील वीज पुरवठा करणार्‍या कंपन्या आधीच वीज दर वाढवण्याची मागणी करत आहेत. वीज कंपन्यांच्या महसुलात चार हजार कोटींहून अधिकची तफावत आहे. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशातही काँग्रेसने मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे.