शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 06:14 IST

१६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले.

बंगळुरू : सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले. सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेताच विधानसभा अध्यक्षांनी सभागृह शुक्रवारपर्यंत तहकूब केले. याचा निषेध म्हणून ‘जोपर्यंत मतदान होणार नाही तोपर्यंत हलणार नाही’, असे जाहीर करून सत्तातुर भाजपच्या सदस्यांनी विधानसभेतच अहोरात्र धरणे सुरू केले.आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सकाळी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु त्यावर चर्चा होण्याऐवजी नवनवे मुद्दे काढून सत्ताधारी व विरोधी भाजप यांच्यात दिवसभर आरोप-प्रत्यारोप व त्यावरून धिंगाणा होत राहिला. काहीही करून ठरावावरील मतदान होता होईतो लांबविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता, तर मध्यरात्र झाली तरी चालेल, पण मतदान आजच व्हायला हवे, असा भाजपचा आग्रह होता.ठराव मांडल्यावर सर्वप्रथम काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. आपापल्या सदस्यांना ‘व्हिप’ काढणे व त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे हा प्रत्येक पक्षाचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु बंडखोर आमदारांना गैरहजर राहण्याची मुभा देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने घटनात्म पेच निर्माण झाला आहे. अध्यक्षांनी आधी याचा निर्णय केल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव तहकूब ठेवला जावा, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून बरीच खडाजंगी झाली. मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले.यानंतर श्रीमंत पाटील या आमच्या आमदारास भाजपने पळवून नेल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून गोंधळाचे दुसरे पर्व सुरू झाले. हे श्रीमंत पाटील पक्षाच्या इतर आमदारांसोबत रिसॉर्टमध्ये होते. पण बुधवारी रात्री ते अचानक ‘गायब’ झाले व एकदम मुंबईत प्रकटले. प्रकृती बिघडल्याने त्यांना आधी बॉम्बे इस्पितळात व नंतर सेंट जॉर्जेस इस्पितळात दाखल केले गेले.त्यांचा स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेतील फोटो दाखवून काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या नावाने शिमगा सुरू  केला. असाच गोंधळ आणखी काही काळ सुरु राहिल्यावर विधानसभा अध्यक्षांनी दु. ३पर्यंत सभागृह तहकूब केले. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी अ‍ॅडव्होकेट जनरलना बोलावून घेतले व त्यांचा कायदेशीर सल्ला घेतला. तर भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले. थोड्या वेळाने राज्यपालांकडून पत्ररूपाने विधानसभा अध्यक्षांना एक ‘संदेश’ पोहोचविण्यात आला. त्यात राज्यपालांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांनी सदासर्वकाळ सभागृहाचा विश्वास संपादन केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर गुरुवारचा दिवस संपण्याआधीच मतदान घेतले जावे.दुपारी सभागृह पुन्हा सुरु झाल्यावर राज्यपालांचे हे पत्र आधीपासून सुरु असलेल्या खडाजंगीत आणखी तेल ओतणारे ठरले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना व सभागृहाला असा आदेश देऊच कसा शकतात, असा सवाल करत सत्ताधाºयांनी विश्वासदर्शक ठराव रोखून धरला. सायंकाळपर्यंत हेच चित्र कायम राहिले. शेवटी चर्चा वा मतदान न होताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (वृत्तसंस्था)>आज दुपारपर्यंतची मुदतविधानसभा अध्यक्षांनी सभागृह तहकूब केल्यानंतर राज्यपालवजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारीदु. १.३० वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी