शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कर्नाटकी त्रांगडे कायम, सरकारचा फैसला आज, भाजपचे अहोरात्र धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 06:14 IST

१६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले.

बंगळुरू : सत्ताधारी आघाडीतील १६ आमदारांच्या राजीनाम्याने कोसळण्याच्या बेतात असलेल्या एच. डी. कुमारस्वामी सरकारचे भवितव्य अधांतरी ठेवून कर्नाटकमधील सत्तानाट्याने गुरुवारी अनपेक्षितपणे नवे वळण घेतले. सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेताच विधानसभा अध्यक्षांनी सभागृह शुक्रवारपर्यंत तहकूब केले. याचा निषेध म्हणून ‘जोपर्यंत मतदान होणार नाही तोपर्यंत हलणार नाही’, असे जाहीर करून सत्तातुर भाजपच्या सदस्यांनी विधानसभेतच अहोरात्र धरणे सुरू केले.आधी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सकाळी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. परंतु त्यावर चर्चा होण्याऐवजी नवनवे मुद्दे काढून सत्ताधारी व विरोधी भाजप यांच्यात दिवसभर आरोप-प्रत्यारोप व त्यावरून धिंगाणा होत राहिला. काहीही करून ठरावावरील मतदान होता होईतो लांबविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता, तर मध्यरात्र झाली तरी चालेल, पण मतदान आजच व्हायला हवे, असा भाजपचा आग्रह होता.ठराव मांडल्यावर सर्वप्रथम काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. आपापल्या सदस्यांना ‘व्हिप’ काढणे व त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे हा प्रत्येक पक्षाचा घटनादत्त अधिकार आहे. परंतु बंडखोर आमदारांना गैरहजर राहण्याची मुभा देणाºया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने घटनात्म पेच निर्माण झाला आहे. अध्यक्षांनी आधी याचा निर्णय केल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव तहकूब ठेवला जावा, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून बरीच खडाजंगी झाली. मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, असे अध्यक्षांनी सांगितले.यानंतर श्रीमंत पाटील या आमच्या आमदारास भाजपने पळवून नेल्याच्या काँग्रेसच्या आरोपावरून गोंधळाचे दुसरे पर्व सुरू झाले. हे श्रीमंत पाटील पक्षाच्या इतर आमदारांसोबत रिसॉर्टमध्ये होते. पण बुधवारी रात्री ते अचानक ‘गायब’ झाले व एकदम मुंबईत प्रकटले. प्रकृती बिघडल्याने त्यांना आधी बॉम्बे इस्पितळात व नंतर सेंट जॉर्जेस इस्पितळात दाखल केले गेले.त्यांचा स्ट्रेचरवर झोपलेल्या अवस्थेतील फोटो दाखवून काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपच्या नावाने शिमगा सुरू  केला. असाच गोंधळ आणखी काही काळ सुरु राहिल्यावर विधानसभा अध्यक्षांनी दु. ३पर्यंत सभागृह तहकूब केले. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी अ‍ॅडव्होकेट जनरलना बोलावून घेतले व त्यांचा कायदेशीर सल्ला घेतला. तर भाजप नेत्यांचे एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपाल वजूभाई वाला यांना भेटले. थोड्या वेळाने राज्यपालांकडून पत्ररूपाने विधानसभा अध्यक्षांना एक ‘संदेश’ पोहोचविण्यात आला. त्यात राज्यपालांनी म्हटले होते की, मुख्यमंत्र्यांनी सदासर्वकाळ सभागृहाचा विश्वास संपादन केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर गुरुवारचा दिवस संपण्याआधीच मतदान घेतले जावे.दुपारी सभागृह पुन्हा सुरु झाल्यावर राज्यपालांचे हे पत्र आधीपासून सुरु असलेल्या खडाजंगीत आणखी तेल ओतणारे ठरले. राज्यपाल विधानसभा अध्यक्षांना व सभागृहाला असा आदेश देऊच कसा शकतात, असा सवाल करत सत्ताधाºयांनी विश्वासदर्शक ठराव रोखून धरला. सायंकाळपर्यंत हेच चित्र कायम राहिले. शेवटी चर्चा वा मतदान न होताच अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (वृत्तसंस्था)>आज दुपारपर्यंतची मुदतविधानसभा अध्यक्षांनी सभागृह तहकूब केल्यानंतर राज्यपालवजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पत्र लिहून शुक्रवारीदु. १.३० वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामी