शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'शेख हसीनाप्रमाणे कर्नाटकच्या राज्यपालांनाही पळावे लागेल...', काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 17:06 IST

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याविरोधात काँग्रेस नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिले.यामुळे आता काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि आमदार त्यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे आमदार इव्हान डिसूजा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपालांनी आदेश मागे न घेतल्यास शेख हसीनाप्रमाणे कर्नाटकातून पळून जावे लागेल, असा इशाराही दिला त्या आमदारांनी दिला आहे. काँग्रेस आमदार इव्हान डिसूझा यांनी बांगलादेशचा हवाला दिला, "तेथे पंतप्रधान शेख हसिना यांना आपले पद आणि देश सोडावा लागला. यावेळी आमदार डिसूझा म्हणाले की, पुढच्यावेळी थेट राज्यपाल कार्यालयात जाऊन निषेध करतील. जसे बांगलादेशातील आंदोलकांनी पीएम हाऊसमध्ये प्रवेश केला. 

"सीएम ममता बॅनर्जी गुन्हेगारांच्या पाठीशी, सत्य लपवले जाते..." कोलकाता घटनेवरुन भाजपाने बंगाल सरकारवर केले आरोप

राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, यामध्ये जमीन गैरव्यवहाराचे काही प्रकरण आहे. काँग्रेस आमदार डिसूझा म्हणाले की, "राज्यपालांनी त्यांचा आदेश मागे घेतला नाही किंवा राष्ट्रपतींनी त्यांना तो मागे घेण्यास सांगितले नाही, तर बांगलादेशात जसे पंतप्रधानांना देश सोडून पळून जावे लागले होते, तसेच कर्नाटकात राज्यपालांचे असेच घडेल. पळून जावे लागेल", पुढील आंदोलन राज्यपालांच्या कार्यालयात असेल, असंही डिसूझा म्हणाले. 

MUDA प्रकरण काय आहे?

MUDA म्हणजेच म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रकरणात, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना त्यांच्या अविकसित जमिनीच्या बदल्यात १४ जमिनीचे तुकडे वाटप केल्याचा आरोप आहे, जो प्राधिकरणाने अधिग्रहित केला होता. या वादात मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हा कथित घोटाळा ४०००-५००० कोटी रुपयांचा असल्याचा दावा केला जात आहे.

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेल्या तपासाच्या आदेशाला सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एका रिट याचिकेत त्यांनी हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आणि अन्यायकारक असल्याचे सांगत चौकशी आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी आपल्या निर्दोषपणावर जोर दिला आणि सांगितले की त्यांच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा इतिहास नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस