शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कर्नाटक सरकार सोमवारपर्यंत तरले; राज्यपालांचे आदेश पुन्हा टोलविले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 06:44 IST

राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले.

बंगळुरू : राज्यपाल वजुभाई वाला यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यासाठी दोन दिवसांत तीन डेडलाइन देऊनही कर्नाटकाच्या विश्वासमताचे घोंगडे सोमवारपर्यंत भिजत राहिले. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी रात्री विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.राज्यपालांना विधानसभाध्यक्षांना आदेश देण्याचा अधिकारच नाही, असा दावा करत मुख्यमंत्री कुमारस्वामी व काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी गुरुवारची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, विधानसभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार चर्चा पूर्ण झाल्याशिवाय विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले जाऊ शकत नाही, हे कारण पुढे करून गुरुवारी रात्री कामकाज स्थगित केले होते. गुरुवारी रात्री भाजपच्या काही आमदारांनी विधानसभेतच ठिय्या मांडला. तेथेच रात्र काढली, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. अखेर राज्यपाल वाला यांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान घेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले, पण विधानसभेत शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करता न आल्याने, याच दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे, असे दुसरे पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना पाठविले. राज्यपालांनी दिलेल्या पहिल्या मुदतीकडे कुमारस्वामींनी दुर्लक्ष केले. आपल्या दुसऱ्या पत्रात वाला यांनी म्हटले आहे की,राज्य सरकारचे बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत घोडेबाजार होण्याचीशक्यता असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया शुक्रवारीच पार पडणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत म्हणाले की, राज्यपालांकडून मला दुसरे प्रेमपत्र आले आहे. आमदार राजीनामे देत होते त्यावेळी चाललेल्या घोडेबाजाराकडे राज्यपालांनी का लक्ष दिले नाही असा सवालही कुमारस्वामी यांनीविचारला.कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार घेऊन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पाठविलेल्या पत्र तसेच सरकारला दिलेल्या मुदतीलाच कुमारस्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभा अध्यक्षांना राज्यपालांनी आदेश देणे हे सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या अशा प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांच्या विरोधात आहे असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.कर्नाटकच्या बंडखोर १५ आमदारांवर विधानसभेत हजर राहाण्यासाठी दडपण आणता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेल्या निकालात म्हटले होते. त्याबद्दलही कुमारस्वामी तसेच कर्नाटक प्रदेश काँग्रेसने या न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या निकालामुळे आमदारांना विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहाण्याबाबत व्हीप काढण्यात अडथळे येत आहेत असे मुख्यमंत्री व काँग्रेसने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.एकाही आमदाराने संरक्षण मागितले नाही : रमेशकुमारएकाही आमदाराने माझ्याकडे संरक्षण मागितलेले नाही असे कर्नाटकचे विधानसभाध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी म्हटले आहे. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी काही जणांनी बंडखोर आमदारांना आपल्या ताब्यात ठेवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी हा शुक्रवारी हा मुद्दा उपस्थित केला होता.>राज्यपाल आदेश देऊ शकतात : घटनातज्ज्ञविधानसभाध्यक्षांना राज्यपाल आदेश देऊ शकतात का, या विषयावर घटनातज्ज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. लोकसभेचे माजी जनरल सेक्रेटरी सुभाष कश्यप यांनी म्हटले आहे की, राज्यघटनेच्या १७५व्या कलमातील तरतुदींनुसार विधिमंडळाला आदेश देण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करणे विधिमंडळाला बंधनकारक आहे.विधेयक मंजुरीविना पडून असल्यास सभागृहाला राज्यपाल सूचना करू शकतात. मात्र, बहुमत सिद्ध करण्यासाठीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश राज्यपाल वजुभाई वाला यांनी कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांना देऊन वेगळाच पायंडा पाडला आहे, असे लोकसभेचे माजी सचिव पी. डी. टी. आचार्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण