शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 18:24 IST

देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे...

बेंगळुरू - देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि माजी मंत्री बी. श्रीरामुलू.

पाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला २२४ पैकी फक्त ४० जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसनं १२२ जागांवर बाजी मारत बहुमत मिळवलं होतं. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू  स्वतंत्रपणे लढल्यानं झालेल्या मतविभाजनाचा फटका भाजपाला बसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं. २०१२ मध्ये भाजपाला राम-राम ठोकलेल्या येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला होता आणि ३५ मतदारसंघांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याचवेळी, श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या.  

येडियुरप्पा भाजपासोबत असते तर कर्नाटक जनता पक्षाला मिळालेल्या सहा जागा आणि मतं त्यांच्या पारड्यात पडली असती. त्यामुळे त्यांची बेरीज ७४ पर्यंत गेली असती. बीएसआरच्या जागा आणि मतांच्या जोरावर त्यांनी ८०चा आकडा सहज पार केला असता, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत येडियुरप्पा आणि श्रीरामुलू हे दोघंही भाजपासोबत होते. मोदी लाट आणि या दोघांचं पक्षातील पुनरागमन या जोरावर, कर्नाटकातील तब्बल १३३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुललं होतं. आज मोदी लाट ओसरली असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू पक्षासोबत असणं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते, असं विश्लेषकांनी नमूद केलं. 

अर्थात, कर्नाटकची लढाई अत्यंत अटीतटीचीच असेल. कारण, 'मिशन २०१९'च्या आधी काँग्रेसकडून आणखी एक राज्य काढून घेऊन भाजपाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय, तर काँग्रेसला हे राज्य राखून आपलं अस्तित्व टिकवायचंय - कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवायचाय. म्हणूनच, कर्नाटकचं सत्तासमीकरण ठरवणाऱ्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. दुसरीकडे, ते कसं खोटं आहे, आधी त्यांनी या प्रस्तावाला कसा विरोध केला होता, हे भाजपा नेते सांगत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कारभारावर ते टीकास्त्र सोडताहेत, पण त्यात त्यांनी उशीर केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होतंय. म्हणजेच, अजून २०-२२ दिवस शिल्लक आहेत. त्यात बरंच काही घडेल, प्रचाराचा धुरळा उडेल. त्यावर बरीच गणितं अवलंबून असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांच्याकडे भाजपाची मंडळी ट्रम्प कार्ड म्हणूनच बघताहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकPoliticsराजकारणElectionनिवडणूक