शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Karnataka Election : ज्यांच्यामुळे २०१३ची निवडणूक गमावली, तेच दोघे भाजपाला जिंकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 18:24 IST

देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे...

बेंगळुरू - देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. ही जोडगोळी म्हणजे, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि माजी मंत्री बी. श्रीरामुलू.

पाच वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला २२४ पैकी फक्त ४० जागा जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसनं १२२ जागांवर बाजी मारत बहुमत मिळवलं होतं. येडियुरप्पा आणि श्रीरामुलू  स्वतंत्रपणे लढल्यानं झालेल्या मतविभाजनाचा फटका भाजपाला बसल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतं. २०१२ मध्ये भाजपाला राम-राम ठोकलेल्या येडियुरप्पांनी कर्नाटक जनता पक्ष स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला होता आणि ३५ मतदारसंघांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याचवेळी, श्रीरामुलू यांच्या बीएसआर काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या.  

येडियुरप्पा भाजपासोबत असते तर कर्नाटक जनता पक्षाला मिळालेल्या सहा जागा आणि मतं त्यांच्या पारड्यात पडली असती. त्यामुळे त्यांची बेरीज ७४ पर्यंत गेली असती. बीएसआरच्या जागा आणि मतांच्या जोरावर त्यांनी ८०चा आकडा सहज पार केला असता, याकडे राजकीय जाणकार लक्ष वेधतात. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत येडियुरप्पा आणि श्रीरामुलू हे दोघंही भाजपासोबत होते. मोदी लाट आणि या दोघांचं पक्षातील पुनरागमन या जोरावर, कर्नाटकातील तब्बल १३३ विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचं 'कमळ' फुललं होतं. आज मोदी लाट ओसरली असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू पक्षासोबत असणं ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते, असं विश्लेषकांनी नमूद केलं. 

अर्थात, कर्नाटकची लढाई अत्यंत अटीतटीचीच असेल. कारण, 'मिशन २०१९'च्या आधी काँग्रेसकडून आणखी एक राज्य काढून घेऊन भाजपाला आपलं वर्चस्व सिद्ध करायचंय, तर काँग्रेसला हे राज्य राखून आपलं अस्तित्व टिकवायचंय - कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवायचाय. म्हणूनच, कर्नाटकचं सत्तासमीकरण ठरवणाऱ्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलंय. दुसरीकडे, ते कसं खोटं आहे, आधी त्यांनी या प्रस्तावाला कसा विरोध केला होता, हे भाजपा नेते सांगत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कारभारावर ते टीकास्त्र सोडताहेत, पण त्यात त्यांनी उशीर केल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

कर्नाटकात १२ मे रोजी मतदान होतंय. म्हणजेच, अजून २०-२२ दिवस शिल्लक आहेत. त्यात बरंच काही घडेल, प्रचाराचा धुरळा उडेल. त्यावर बरीच गणितं अवलंबून असली, तरी येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांच्याकडे भाजपाची मंडळी ट्रम्प कार्ड म्हणूनच बघताहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकPoliticsराजकारणElectionनिवडणूक