शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karnataka Election Results 2018: मोदी-शहांनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 04:39 IST

काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला.

बंगळुरू/ नवी दिल्ली : काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला. तोपर्यंत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत यांनी जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी चर्चा करून, पाठिंब्याचा प्रस्ताव दिला. त्या पक्षाने तो लगेचच मंजूर केला. त्यानंतर, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीही देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली.हे सुरू असताना भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला आम्ही स्वच्छ सरकार देऊ आणि राज्याचा वेगाने विकास घडवू, असे आश्वासन दिले. काही राजकीय पक्ष संघराज्याची संकल्पना मोडीत काढायला निघाले असून, त्यांना कर्नाटकातील जनतेने धडा शिकविला आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. भाजपा हा हिंदी राज्यातील पक्ष आहे, अशी टीका आमच्यावर केली जाते, पण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, त्रिपुरा तसेच ईशान्येकडील राज्ये काय हिंदीतून बोलतात की काय, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, आजच्या घडीला केवळ भाजपा हाच राष्ट्रव्यापी पक्ष असून, इतर पक्ष एखाद्या वा दोन-तीन राज्यांपुरते सीमित राहिले आहेत. अमित शहा म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झाला असून, राहुल गांधी यांचे नेतृत्व लोकांना मान्य झालेले नाही. त्यामुळे २0१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला आणखी मोठे यश मिळेल आणि आम्ही २0२२ पर्यंत नवा भारत उभा करू. शहा यांनी काँग्रेसने राज्यात जाती-पातींचे राजकारण केले आणि दलितांना भडकावण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला यशाचा रथ यापुढेही असाच सुरू राहील. मोदी यांनी अमूल्यवेळ दिला आणि त्याचा फायदा पक्षाला मिळाला आहे, असे शहा म्हणाले. (वृत्तसंस्था)>विजयोत्सव थंडावला? : भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल, असे त्या पक्षाच्या सर्वच नेत्यांना वाटत होते. त्यामुळे बंगळुरू व दिल्लीत मोठा जल्लोष करण्याचे भाजपाने ठरविले होते, पण जसजसे निकाल येत गेले आणि स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसतसे आनंद कमी होत गेला. त्यामुळे दिल्लीतील पक्ष मुख्यालयात विजयोत्सव फार मोठ्या प्रमाणात न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८