शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“सिद्धरामय्या यांच्या नावात राम, माझ्या नावात शिव; आम्हाला धर्म शिकवू नये”: डीके शिवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 09:33 IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही, असे सांगत डीके शिवकुमार यांनी भाजपावर टीका केली.

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. काँग्रेससह अन्य पक्ष राम मंदिर सोहळ्यापासून अलिप्त राहिले. राम मंदिर सोहळ्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपावर टीका केली आहे. सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे आणि माझ्या नावात शिव आहे. त्यामुळे कुणी आम्हाला धर्म शिकवू नये, असे डीके शिवकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले.

राम मंदिर सोहळ्यानिमित्त देशात अनेक ठिकाणी सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने सुटी जाहीर केली नाही. यावरून भाजपाने टीका केली होती. या टीकेला डीके शिवकुमार यांनी उत्तर दिले. आम्ही आमच्या श्रद्धा आणि धर्माचा आदर करतो. आम्ही त्याची प्रसिद्धी, दिखाऊपणा करणार नाही. आम्हाला कोणी विचारले नाही, पण आमचे मंत्री मंदिरात पूजा करतात. आमच्या प्रार्थना फळ नक्कीच मिळेल, असे डीके शिवकुमार म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे, माझ्या नावात शिव आहे. कोणीही आपल्याला धार्मिकता शिकवण्याची किंवा दबाव आणण्याची गरज नाही. आम्ही आमचे कर्तव्य करू, असे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाने त्यांचेच नेते निवडले. देशात अनेक नेते आणि मुख्यमंत्री आहेत. राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही. प्रत्येक धर्मावर आणि त्याच्या प्रतिकांवर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा अधिकार नाही, अशी टीका डीके शिवकुमार यांनी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही भाजपावर टीका केली. आम्हीदेखील श्रीरामचंद्रांची पूजाही करतो. आम्हीही श्रीरामभक्त आहोत. आम्ही राम मंदिरही बांधले आहे. आम्ही श्रीरामचंद्रांच्या विरोधात नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस महात्मा गांधींच्या रामाची पूजा करते, तर भाजप त्यांची पूजा करत नाही. भाजपा श्रीरामाला, सीता आणि लक्ष्मणापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. हनुमान, लक्ष्मण आणि सीतेशिवाय श्रीराम अपूर्ण आहेत. श्रीराम फक्त अयोध्येपुरते मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. आम्ही श्रीरामाच्या विरोधात आहोत, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पण, हे योग्य नाही, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण