शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गायीनं गिळली २० ग्रॅम सोन्याची चेन; महिनाभर शेणावर नजर ठेवली, काही मिळालं नाही, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 12:55 IST

गायीच्या गळ्यातील सोनसाखळी गायब झाल्याचं आढळलं. ही चेन शोधण्याचा खूप प्रयत्न झाला. त्यानंतर घरच्यांनी अंदाज लावला की, ही चेन फुलांसोबत गाईनं गिळली असावी.

कर्नाटकच्या सिरसी तालुक्यातील हिपानाहल्ली परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीची २० ग्रॅम सोन्याची चेन गायीनं गिळली. सुरुवातीला महिनाभर या व्यक्तीने गायीच्या शेणावर नजर ठेवली. परंतु जेव्हा ही चेन सापडलीच नाही तेव्हा त्या व्यक्तीने गायीला घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी गायीची तपासणी केली तेव्हा ही चेन गायीच्या पोटात असल्याचं दिसून आले.

रिपोर्टनुसार, श्रीकांत हेगडे यांच्याकडे गाय आणि वासरु आहे. दिवाळीच्या निमित्ताने हेगडे कुटुंबाने गौ-पूजा केली. त्यासाठी गायीला आणि वासराला आंघोळ घालून त्यांना फुलांनी सजवण्यात आले. काही जण गायीला लक्ष्मीचं रुप मानतात. त्यामुळे गायीला मौल्यवान दागिन्यांनी नटवलं जाते. पूजा झाल्यानंतर हे सर्व दागिने काढले जातात. श्रीकांत हेगडे यांच्या कुटुंबाने गाईला २० ग्रॅम सोन्याची साखळी घातली होती. परंतु सोनसाखळी काढताना फुलांच्या अन्य सामानासोबत ते गायीच्या समोर ठेवण्यात आले.

त्यानंतर गायीच्या गळ्यातील सोनसाखळी गायब झाल्याचं आढळलं. ही चेन शोधण्याचा खूप प्रयत्न झाला. त्यानंतर घरच्यांनी अंदाज लावला की, ही चेन फुलांसोबत गाईनं गिळली असावी. जवळपास ३० ते ३५ दिवस कुटुंबातील लोक गायीच्या शेणाकडे लक्ष देत होते. कदाचित ही चेन सापडेल अशी आशा त्यांना होती. परंतु काहीच हाती न लागल्याने निराशा पसरली. अखेर मदतीसाठी त्यांनी पशु वैद्यकीय दवाखाना गाठला. याठिकाणी मेटल डिटेक्टरच्या मदतीनं गायीची तपासणी केली. तेव्हा तिच्या पोटात धातू असल्याचं दिसून आले. त्यानंतर गायीचं पोट स्कॅन करुन ही चेन कुठे अडकली आहे याचा शोध घेतला.

कुटुंबाच्या परवानगी गायीची सर्जरी करण्यात आली. त्यानंतर ही चेन बाहेर काढली. परंतु सोनसाखळीचं वजन २० ग्रॅमहून १८ ग्रॅम झालं होतं. या सोन्याच्या साखळीचा छोटा भाग गायब झाला होता. परंतु चेन परत मिळाली त्यामुळे कुटुंबाने आनंद व्यक्त केला. पण त्याचसोबत कुटुंबातील लोकांच्या चुकीमुळे गायीला या अडचणीतून जावं लागलं याचीही खंत साऱ्यांनी व्यक्त केली.