शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

“धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करुन भाजपाने १४० कोटी जनतेचा अपमान केला”: सिद्धरामय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:28 IST

Ayodhya Ram Mandir: PM मोदींकडे लोकसभा निवडणुका कामगिरीच्या जोरावर लढवण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे भाजपाने घाईने राम मंदिर सोहळा आयोजित केला, अशी टीका करण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या भव्य सोहळ्यावरून देशातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत काँग्रेसने या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपा नेते काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत असून, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण 'आदरपूर्वक नाकारत' आहे. भाजपा आणि RSS निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सर्व हिंदूंचा विश्वासघात केला जात आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा हा धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर झाले आहे, या शब्दांत सिद्धरामय्या यांनी हल्लाबोल केला. 

या निर्णयाला माझा पाठिंबा आहे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी या सर्वांनी रामलल्लाच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. एका धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करून १४० कोटी भारतीयांचा अपमान करण्यात आला आहे. हा सर्व हिंदूंचा विश्वासघात आहे. हा एक धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर केले जात आहे. रामजन्मभूमी वादाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींना देशाची सत्ता हाती घेऊन १० वर्षे झाली, पण मतदारांसमोर आपण केलेल्या कामगिरीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करत आहे. भाजपा आणि संघाचे राजकारण जनतेला कळत आहे. ते त्यांच्या फंदात पडणार नाहीत. राम मंदिराच्या उभारणीसाठी घेतलेल्या देणगीचा हिशेब जनतेकडून मागितला जात आहे. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, नारायण गुरू यांसारख्या महान व्यक्तींनी जो हिंदू धर्म पाळला त्याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या दांभिक हिंदुत्वाची आम्हाला अडचण आहे, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरcongressकाँग्रेसsiddaramaiahसिद्धरामय्याsiddaramaiahसिद्धारामय्या