शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Coronavirus : कर्नाटकात कोरोना निर्बंध शिथिल होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, तज्ज्ञांच्या बैठकीत अंतिम निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:01 IST

Karnataka CM Basavaraj Bommai : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना ताप आणि खोकला येत आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेत लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बंगळुरू : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, राज्यात लागू केलेले निर्बंध, वीकेंड आणि रात्रीचा कर्फ्यू हटवण्यासाठी 21 जानेवारीला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. 

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना ताप आणि खोकला येत आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेत लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले. लोक कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपला दैनंदिन व्यवसाय करू शकतात. तज्ज्ञांच्या समितीला लोकांच्या भावना अवगत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, लोकांच्या मागणीकडे लक्ष देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. समिती राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे, असे बसवराज बोम्मई म्हणाले.

शुक्रवारी होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीत राज्याचे संपूर्ण चित्र समोर येईल, असे बसवराज बोम्मई म्हणाले. तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवरही भार नाही. आम्ही रुग्णालयांना ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली, ज्यात काँग्रेसने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी तक्रार नोंदवण्याची गरज नसल्याचे बसवराज बोम्मई म्हणाले. ते म्हणाले की, मी मुख्य सचिव पी. रविकुमार यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यांसह सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वीकेंड कर्फ्यू उठवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी हेच मत व्यक्त केले.

21 जानेवारीला तज्ज्ञांची बैठकमुख्यमंत्री बसवराज बोम्मई शुक्रवारी सकाळी तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. जनतेच्या पाठिंब्याचे हे सरकार असून जनतेचे हित लक्षात घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. लोकांचे जीव वाचवणे ही सरकारची पहिली प्राथमिकता आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीत सर्वच बाबींवर चर्चा केली जाईल आणि बैठकीत घेतलेला निर्णय जाहीर केला जाईल, असेही बसवराज बोम्मई म्हणाले.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcorona virusकोरोना वायरस बातम्या