शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सीमावादाचे राजकारण करतोय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 11:50 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर टीका केली आहे. 

बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका करत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न

हाराष्ट्र राज्य विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाबाहेर केलेल्या विधानांवरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. याआधीच सीमावादातून राजकीय फायदा उठविण्याचा निष्फळ प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. यावेळी ते तसे करण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका बोम्मई यांनी केली. तसेच मुंबई काढण्यात आलेला महामोर्चा राजकीय हेतूने प्रेरित होता, असे बोम्मई यांनी म्हटले आहे. जनतेचा पाठिंबा नसतानाही त्यांनी पक्षाचे झेंडे घेऊन मोर्चा काढला. ज्यात विरोधी पक्षांचे सदस्य आणि त्यांचे पदाधिकारीच सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. तसेच हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही स्पष्टपणे दिसून येते, या शब्दांत बोम्मई यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, ज्या वेळी दोन्ही राज्यातील लोक सौहार्दपूर्ण संबंध ठेवत आहेत, व्यवसाय करत आहेत आणि लोक राज्याराज्यांमध्ये प्रवास करत आहेत, अशा वेळी हे नेते कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्याचा आणि लोकांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे नमूद केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादKarnatakकर्नाटकPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी