शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Karnataka Assembly election 2018: बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी देणारे वजूभाई पहिलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 13:33 IST

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या आधी अनेक राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षास अवधी दिला होता.

 

नवी दिल्ली- कर्नाटकामध्ये यावेळची विधानसभा त्रिशंकू होईल याचा अंदाज ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलने आधीच वर्तवला होता. जदसेला किंगमेकर होण्याची स्वप्नंही पडली होती. मात्र निवडणुकीनंतर विधानसभेत सरकार स्थापन होणे सोपे नसल्याचे दिसून आले. भाजपाला सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले व बहुमत सिद्ध करण्यासाठी संकेतांनुसार १५ दिवसांची मुदत दिली. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.

वजूभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस दिल्याने घोडेबाजार होईल, आमदार विकत घेण्याची संधी भाजपाला मिळेल असा आरोप होत आहे. वास्तविक वजूभाई वाला हे काही बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देणारे पहिले व्यक्ती नाहीत. स्वतंत्र भारताचा इतिहास पाहाता ज्या ज्यावेळेस त्रिशंकू सभागृहाची किंवा आघाडी करुन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा केंद्रामध्ये राष्ट्रपती व घटकराज्यांत राज्यपालांनी सत्तेचा दावा करणार्या पक्षांना असा वेळ दिलेला दिसून येतो.

१९९६ साली राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र अटलबिहारी वाजपेयी हे १३ व्या दिवशीच लोकसभेला सामोरे गेले, त्यांना त्यावेळेस बहुमत सिद्ध करता आले नाही. १९९८ साली वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवस मिळाले होते. वाजपेयी यांनी ९ व्या दिवशीच लोकसभेत बहुमत सिद्ध केले. 

हे झाले अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील उदाहरण. त्यांच्यापूर्वी व्ही. पी. सिंग आणि पी. व्ही.नरसिंह राव यांच्या सरकारांना तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी चक्क १ महिन्याची मुदत दिली होती. व्ही. पी. सिंग यांचे सरकार डावे आणि भाजपा यांच्या पाठिंब्यावर तरले होते. गोव्यामध्येही राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मणिपूरमध्ये राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी ९ दिवसांचा अवधी दिला होता. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatakकर्नाटकGovernmentसरकारBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा