शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Karnataka Assembly election 2018: बहुमत सिद्ध करण्यासाठी अवधी देणारे वजूभाई पहिलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 13:33 IST

कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांच्या आधी अनेक राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सत्तेचा दावा करणाऱ्या पक्षास अवधी दिला होता.

 

नवी दिल्ली- कर्नाटकामध्ये यावेळची विधानसभा त्रिशंकू होईल याचा अंदाज ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलने आधीच वर्तवला होता. जदसेला किंगमेकर होण्याची स्वप्नंही पडली होती. मात्र निवडणुकीनंतर विधानसभेत सरकार स्थापन होणे सोपे नसल्याचे दिसून आले. भाजपाला सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले व बहुमत सिद्ध करण्यासाठी संकेतांनुसार १५ दिवसांची मुदत दिली. त्यांच्या या निर्णयावर सर्वत्र टीका होत आहे.

वजूभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस दिल्याने घोडेबाजार होईल, आमदार विकत घेण्याची संधी भाजपाला मिळेल असा आरोप होत आहे. वास्तविक वजूभाई वाला हे काही बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ देणारे पहिले व्यक्ती नाहीत. स्वतंत्र भारताचा इतिहास पाहाता ज्या ज्यावेळेस त्रिशंकू सभागृहाची किंवा आघाडी करुन सत्ता स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा केंद्रामध्ये राष्ट्रपती व घटकराज्यांत राज्यपालांनी सत्तेचा दावा करणार्या पक्षांना असा वेळ दिलेला दिसून येतो.

१९९६ साली राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मात्र अटलबिहारी वाजपेयी हे १३ व्या दिवशीच लोकसभेला सामोरे गेले, त्यांना त्यावेळेस बहुमत सिद्ध करता आले नाही. १९९८ साली वाजपेयी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवस मिळाले होते. वाजपेयी यांनी ९ व्या दिवशीच लोकसभेत बहुमत सिद्ध केले. 

हे झाले अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील उदाहरण. त्यांच्यापूर्वी व्ही. पी. सिंग आणि पी. व्ही.नरसिंह राव यांच्या सरकारांना तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांनी चक्क १ महिन्याची मुदत दिली होती. व्ही. पी. सिंग यांचे सरकार डावे आणि भाजपा यांच्या पाठिंब्यावर तरले होते. गोव्यामध्येही राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला होता. मणिपूरमध्ये राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी ९ दिवसांचा अवधी दिला होता. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatakकर्नाटकGovernmentसरकारBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा