शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
8
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
10
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
16
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
17
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
18
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
19
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
Daily Top 2Weekly Top 5

"माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असेल पण..."; कारगीलमधून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:35 IST

PM Modi on Kargil Diwas: कारगिल विजय दिवसाच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी कारगिल युद्ध स्मारकालाही भेट दिली. यावेळी २० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान, दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोध यावर भाष्य केले. पाकिस्तानला इशारा देताना पंतप्रधान मोदी यांनी आम्ही दहशतवादाचा पूर्ण ताकदीने मुकाबला करू असे म्हटलं आहे.

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त पाकिस्तानला कडक इशारा दिला. पंतप्रधानांनी लडाखमधील शिंकुन ला बोगद्यासाठी पहिला स्फोट देखील केला.  शिंकुन ला बोगदा प्रकल्प निमू - पदुम - दारचा रोडवर सुमारे १५,८०० फूट उंचीवर बांधला जात असून तो पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात उंच बोगदा असेल. कारगिल वॉर मेमोरिअल येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भाषण केले.

"२५ वर्षांपूर्वी भारताने कारगिल युद्ध केवळ जिंकले नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचे अद्भुत उदाहरण दिले. पाकिस्तानला प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून चर्चेत राहायचे आहे. त्यांनी त्यांच्या इतिहासातून काहीच शिकलेले दिसत नाही. यापूर्वी दहशतवादाबाबत त्यांचे सर्व प्रयत्न फसले होते. मी जिथून उभा आहे तिथून माझा आवाज दहशतवाद्यांपर्यंत पोहोचत असावा. त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे शूर जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने चिरडून टाकतील. शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. लडाख असो वा जम्मू-काश्मीर, भारत विकासासमोरील प्रत्येक आव्हानाला नक्कीच पराभूत करेल," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"लष्करातील सुधारणांना आमचे पहिले प्राधान्य आहे. अग्निपथ योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला, मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. पण सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

"काही लोकांच्या विचारसरणीला काय झाले आहे हे मला कळत नाहीये. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा भ्रम ते पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचारांची मला लाज वाटते. पण मला अशा लोकांना विचारायचे आहे की मोदी सरकारच्या राजवटीत आज जो कोणी भरती होईल त्याला आजच पेन्शन द्यावी लागेल का? त्यांना पेन्शन देण्याची वेळ ३० वर्षात येईल आणि तोपर्यंत मोदी १०५ वर्षांचे होतील. तुम्ही कोणता युक्तिवाद देत आहात? माझ्यासाठी पक्ष नाही तर देश सर्वोच्च आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर राष्ट्रीय धोरणासाठी काम करतो, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान