शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Kargil Vijay Diwas : नन्हा मुन्ना राही, कारगिल युद्धातील पराक्रमी सिपाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 10:05 IST

Kargil Vijay Diwas : फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता.

नवी दिल्ली - कारगिल युद्धांच्या आठवणींना आज 19 वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने कारगिलमध्ये बर्फाळ जमिनीवर तिरंगा फडकवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली होती. 1999 मध्ये 18000 फूट उंचीवर पाकिस्तानच्या कूटनितीला भारतीय सैन्यांतील बहादूर जवानांनी आपल्या बलिदानाने उत्तर दिले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात 527 जवानांना वीरमरण आले होते. यापैकीच एक जवान म्हणजे मनजीत सिंग. 

फरीदाबादच्या कांसापूर येथील रहिवासी असलेल्या मनजीत यांनी कारगिलच्या युद्धात पाकिस्तानशी लढताना पराक्रम गाजवला होता. तसेच ते कारगिलमध्ये शहीद झालेले सर्वात कमी ते वयाचे जवान होते. एका शेतकरी कुटुंबात शहीद मनजीत सिंग यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच देशाप्रती प्रेम असल्याने देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेसाठी त्यांचे वडील गुरचरण सिंग यांनी त्यांना 1998 मध्ये सैन्यात भरती केलं. त्यानंतर साधारण दीड वर्षांनी मनजीत यांची ड्यूटी कारगिलसाठी लावण्यात आली. 7 जून 1999 रोजी पाकिस्तानशी दोन हात करताना मनजीत सिंग हे शहीद झाले. 

मनजीत यांच्या नातेवाईकांनी अभिमानाने त्यांना सैन्यात भरती केल्याच सांगत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच अशाप्रकारे ते लवकर सोडून जातील असा विचार ही केला नसल्याचं त्यांनी म्हटलं. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांपैकी मनजीत हे सर्वात लहान वयाचे जवान होते. वयाच्या 17 व्या वर्षी ते सैन्यात भरती झाले. तर त्यानंतर अवघ्या दीड वर्षांनी मनजीत युद्धात शहीद झाले.  

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवान