शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

"डोळे बरे करून दाखवा, ब्लँक चेक देईन, पण..."; करौली बाबांना वकिलाचं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 18:53 IST

डॉक्टरांसोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर बाबा एका दिवसात कोणताही आजार बरा करण्यास सक्षम असल्याचा दावा करत होते. 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील करौली आश्रमात एका भक्तासोबत मारहाणीच्या वादात अडकलेल्या बाबा संतोष भदौरिया यांना एका व्यक्तीने ओपन चॅलेंज दिलं आहे. "कोणताही आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या बाबांनी डोळे बरे केले तर मी त्यांना ब्लँक चेक देईन" असं म्हटलं आहे. डॉक्टरांसोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर बाबा एका दिवसात कोणताही आजार बरा करण्यास सक्षम असल्याचा दावा करत होते. 

"मी सनातनी आहे, बाबांना आव्हान देतो की..."

कानपूरमधील बाबा करौली शंकर धाममध्ये पोहोचल्यानंतर वकील अनिरुद्ध जैस्वाल यांनी बाबांना आव्हान दिले. ते त्यांच्या ड्रायव्हरसह कोर्टात पोहोचले. अपघातात त्याच्या एका डोळ्याला इजा झाल्याचे चालकाने सांगितले. यावेळी वकिलाने सांगितले की, "जर बाबांनी डोळे बरे केले तर मी त्यांना ब्लँक चेक देईन, पण ते तसे करू शकत नसतील तर बाबांनी खोटे दावे करणे थांबवावे. मी सनातनी आहे. मी बाबांना आव्हान देतो की, माझ्या ड्रायव्हरचे खराब झालेले डोळे बरे करावेत."

करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर यापूर्वी एका भक्ताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. बाबा आणि व्यक्तीमध्ये वाद झाल्याचे दिसून येते. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविकांची गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्रमात भाविकांना 100 रुपयांची पावती फाडावी लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

करौली आश्रमात 1.5 लाखांचा होम करताच मुलगा बेपत्ता, दुसऱ्या दिवशी वडील गायब

 झारखंडमधून उपचारासाठी आलेल्या एका कुटुंबाने करौली आश्रमावरच आता सवाल उपस्थित केला आहे. कुटुंबीय आपल्या लहान मुलावर उपचार करण्यासाठी करौली आश्रमात आले होते, मात्र कुटुंबप्रमुख आणि आजारी मुलगा आश्रमातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. झारखंडमधील देवघर येथील एक कुटुंब आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी 24 जानेवारीला करौली आश्रमात आले होते. हे कुटुंब करौली शंकर महादेवाच्या दरबारात पोहोचले होते. करौली शंकर महादेव यांनी होम-हवन करण्याची सूचना केली होती. दीड लाख रुपयांचा होम करावा, असे आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले. 25 जानेवारी रोजी कुटुंबाच्या वतीने दीड लाख रुपये खर्च करून होम करण्यात आला. 

होम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीला आजारी मुलगा बेपत्ता झाला. तर त्यानंतर 27 जानेवारी रोजी कुटुंबप्रमुख अचानक गायब झाले. यानंतर कुटुंबीयांच्या वतीने दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास 10 दिवसांनंतर आश्रमापासून 150 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात एक मानसिकरित्या आजारी मुलगा सापडला. कुटुंबीयांनी त्याला परत आणले, मात्र वडिलांचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर कुटुंबीयांनी 9 फेब्रुवारी रोजी कानपूरमधील विधनू पोलीस ठाण्यात व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. दोन महिने झाले तरी वडील बेपत्ता आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"