शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

‘कणखर’ मोदींची वायकोंमुळे तारांबळ

By admin | Updated: May 24, 2014 03:56 IST

पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना निमंत्रण देण्यावरून भडकलेले ‘एमडीएमके’चे संस्थापक अध्यक्ष वायको यांच्या धमकीमुळे नरेंद्र मोदी यांची तारांबळ उडाली.

गजानन जानभोर, नवी दिल्ली - नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना निमंत्रण देण्यावरून भडकलेले ‘एमडीएमके’चे संस्थापक अध्यक्ष वायको यांच्या धमकीमुळे नरेंद्र मोदी यांची तारांबळ उडाली. शेवटी शुक्रवारी दुपारी भाजपाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी वायको यांची मनधरणी केली आणि त्यांना खूश करण्यासाठी श्रीलंकेतील तामिळ मुख्यमंत्र्यांना शपथविधीचे निमंत्रण देण्याचा तोडगा काढण्यात आला. मोदी यांच्या शपथविधीला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना बोलावण्यास वायको यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून भाजपात अस्वस्थता आहे. मोदी यांच्या शपथविधीसाठी ‘सार्क’मधील सर्व देशांचे प्रमुख आणि पंतप्रधानांना निमंत्रण दिले. त्याचाच एक भाग म्हणून श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांना बोलविणे आवश्यक आहे, अशी आपली बाजू भाजपाने वायको यांच्याकडे मांडली. परंतु वायकोंचा श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना तीव्र विरोध आहे. राजपक्षे यांच्या कार्यकाळात तामिळ जनतेवर सातत्याने अन्याय होत आहे. शिवाय ते जर आले तर तामिळ जनतेच्या भावना दुखावतील ही वायकोंची भूमिका आहे. हा वाद निर्माण झाल्यानंतर दोन दिवस दिल्ली शांत होती. परंतु गुरुवारी रात्री नरेंद्र मोदी दिल्लीत आल्यानंतर वायकोंची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू झाले. नरेंद्र मोदी यांनी रात्री यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि जेष्ठ नेते अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली. शुक्रवारी सकाळी या दोन्ही नेत्यांनी फोनवर वायको यांच्याशी संपर्क साधून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु वायको आपल्या भूमिकेवर ठाम होते. आज शुक्रवारी दुपारी पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी वायको यांना आपल्या निवासस्थानी चहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार वायको यांनी राजनाथ आणि जेटली यांची भेट घेतली. या चर्चेतून यशस्वी तोडगा काढण्यात आला. या तोडग्यानुसार वायको यांना खूश करण्यासाठी श्रीलंकेच्या उत्तर प्रांताचे पहिले तामिळ मुख्यमंत्री सी.व्ही. विघ्नेस्वरन यांनादेखील मोदी यांच्या शपथविधीचे निमंत्रण देण्याचे ठरले. शुक्रवारी दुपारी राजनाथ यांनी मुख्यमंत्री विघ्नेस्वरन यांना फोनवरून निमंत्रण दिले. वायको यांची समजूत घालता घालता दोन दिवस भाजपा नेत्यांची बरीच दमछाक झाली. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या भाजपाला भविष्यात मित्रपक्षांच्या भूमिकेचाही तेवढाच सन्मान करावा लागेल हे या प्रकरणातून समोर आले आहे. शपथविधी समारंभापूर्वी कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी मित्रपक्ष असलेल्या ‘एमडीएमके’च्या वायकोंची मनधरणी करताना ‘कणखर’ नरेंद्र मोदी यांना मात्र दोन पावले माघार घ्यावी लागली.