शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली; एस जयशंकर संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:49 IST

जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवलेल्या कनिष्क विमान अपघाताची आठवण करुन दिली.

S Jaishankar on Kanishka Plane Blast :कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता भारताकडून प्रतिक्रिया आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कनिष्क विमान अपघाताचा उल्लेख करुन दहशतवादाच्या मुद्द्यावरून कॅनडाला आरसा दाखवला. आज कनिष्क विमान अपघाताचा (Kanishka Plane Blast) 39वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी आज त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच त्यांनी दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही कॅनडाला दिला.

एस जयशंकर यांनी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, "आज इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादाच्या कृत्यांपैकी एकाची 39 वा स्मृतिदिन आहे. 1985 मध्ये आजच्याच दिवशी मरण पावलेल्या AI 182 'कनिष्क' च्या 329 प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ही जयंती आपल्याला याची आठवण करून देते की, दहशतवाद कधीही खपवून घेतला जाऊ नये."

भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांना श्रद्धांजली वाहिलीकॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. “भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यात आघाडीवर आहे आणि या जागतिक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत आहे,” असे दूतावासाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. 

कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने फोडली डरकाळीदरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. अशातच मंगळवारी(दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. त्यावरुन एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली. 

त्या दिवशी नेमकं काय झालं? 23 जून 1985 रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अटलांटिक महासागरावरुन उडताना कोसळले होते. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी या विमानात बॉम्ब ठेवला होता. या हल्ल्यात 329 लोक मारले गेले, ज्यात 268 कॅनडा, 27 ब्रिटिश आणि 24 भारतीय नागरिकांचा समावेश होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरCanadaकॅनडाInternationalआंतरराष्ट्रीय