शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Kanhaiya Kumar: “बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते”; कन्हैय्याची नितीश सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 09:42 IST

Kanhaiya Kumar: कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते.

पाटणा: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता तसेच अलीकडेच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) बिहारमध्ये दोन जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत. बिहारमधील कुशेश्वरस्थान आणि तारापूर येथे पोटनिवडणुका होत आहेत. यावेळी एका प्रचारसभेला संबोधित करताना कन्हैय्या कुमारने बिहारमधील नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली असून, बिहारच्या लोकांना हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यांत जावे लागते, असा खोचक टोला लगावला आहे. 

तारापूर येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून राजेश कुमार मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार काँग्रेसचे उमेदवार राजेश कुमार मिश्रा यांच्या प्रचारार्थ तारापूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी नितीश कुमार सरकारवर जोरदार टीका केली. कुशेश्वरस्थान आणि तारापूर या दोन्ही जागांसाठीच्या पोटनिवडणुका ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 

बिहारमध्ये विस्थापितांचा खूप मोठा प्रश्न

बिहारमधील नागरिकांना नोकरी, शिक्षण, उपचार केवळ यांसाठी नव्हे तर हनीमूनसाठीही दुसऱ्या राज्यात जावे लागते. बिहारमध्ये विस्थापितांचा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच बिहारमध्ये विकास कुठेच दिसत नाही, अशी टीका कन्हैय्या कुमारने केली आहे. काँग्रेस आणि आरजेडी स्वबळावर निवडणूक लढत आहे. याबाबत बोलताना कन्हैय्या कुमारने सांगितले की, काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे. मोठ्या पक्षासाठी मन मोठे आणि खुले ठेवायला हवे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असतो, असे कन्हैय्या कुमारने म्हटले आहे. 

दरम्यान, हल्लीच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कन्हैया कुमारने भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा आणि उजवी मंडळी ज्या तुकडे-तुकडे घोषणेवरून कन्हैयावर टीका करत असे, त्याच तुकडे तुकडे घोषणेचा आधार घेत कन्हैयाने भाजपला टोला लगावला आहे. आता आम्ही भगवा पार्टीचे तुकडे तुकडे करणार असा इशारा कन्हैया कुमारने दिला. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारNitish Kumarनितीश कुमारBiharबिहार