शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kangana Ranaut : कंगना राणौतवर ९१ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक आजी कडाडल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं आवाहन, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 22:51 IST

अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे देशद्रोह होय. तरुणांमध्ये चुकीचा गैरसमज पसरू नये म्हणून तिच्यावर कारवाई व्हायलाच हवी. लोकशक्तीचा कंगनाकडून अपमान आणि तो माझ्यासारखी स्वातंत्र्यसैनानी विसरू शकत नाही - असा संताप त्यांनी व्यक्त केला.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut ) हिनं वादग्रस्त विधान केलं आहे. ''आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं,''असं तिचं ते विधान होतं. तिच्या या विधानावर अनेकांनी टीका केली, परंतु मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी या वादात उडी घेतली आहे. कंगना जे बोलली ते खरं आहे, ती जे बोलली मी त्याचं समर्थन करतो, असे विक्रम गोखले म्हणाले. अनेक राजकीय मंडळींनी कंगनावर टीका केली आहेत. त्यात ९१ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक नीला चितळे ( Nila Chitale) यांनी त्या विधानावरून कंगनाला धारेवर धरले.

त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या म्हणतात,''वयाच्या बाराव्या वर्षी मी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. तेव्हा पोलिसांनी आम्हाला पकडून दिवसभर पोलीस चौकीत बसवून ठेवले होते. स्वातंत्र्यासाठी माझा भाऊ आणि आई तुरुंगात गेले होते. असं असताना कंगनाचे वक्तव्य पाहून संताप येतोय.''

''स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात सर्व जाती-धर्माच्या लोकांनी भाग घेतला होता. माझा भाऊ साडेतीन वर्ष तुरुंगात होता, यावेळी एका मुस्लीम कुटुंबाने आम्हाला मदत केली होती. स्वातंत्र्यलढ्यासाठी आम्ही इतकं सारं भोगलं असताना जेव्हा ती बाई वादग्रस्त विधान करते तेव्हा मला संताप आला, तिच्या वक्तव्याचा मी निषेध करते,'' असेही त्या म्हणाल्या.

''तिला समज देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. पंतप्रधानांना माझी विनंती आहे की त्यांनी जाहीरपणे राष्ट्राला सांगावं की त्यांनी तिला समज दिली आहे. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे देशद्रोह होय. तरुणांमध्ये चुकीचा गैरसमज पसरू नये म्हणून तिच्यावर कारवाई व्हायलाच हवी. लोकशक्तीचा कंगनाकडून अपमान आणि तो माझ्यासारखी स्वातंत्र्यसैनानी विसरू शकत नाही,''अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला.     

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौत