शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 15:44 IST

अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान, एका रेल्वे प्रवाशाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या धडकेमुळे तीन बोगींचं मोठं नुकसान झालं. अपघातस्थळी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. याच दरम्यान, एका रेल्वे प्रवाशाने नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. 

एका प्रवाशाने अपघाताबाबत सांगितलं की, "ट्रेन मागून जोरात धडकली तेव्हा मी झोपलो होतो. या धडकेमुळे माझ्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर मी ताबडतोब माझ्या कुटुंबाकडे गेलो, जिथे माझं कुटुंब बसलं होतं. मी बाहेर पाहिलं तेव्हा मला कळलं की, काही लोकांचा मृत्यू झाला आहे. दुखापतीमुळे मला फारसं समजू शकलं नाही. प्रत्येक कोपऱ्यातून लोक मदतीसाठी ओरडत होते. हा एक भयंकर क्षण होता."

अधिकाऱ्यांनी कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेवर माहिती दिली. "या घटनेत २५ लोक जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आम्ही लवकरात लवकर बचाव कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालगाडीने कांचनजंगा एक्स्प्रेसला पाठीमागून धडक दिली आहे, हे नेमकं कसं झालं हे तपासानंतरच कळेल" असं म्हटलं आहे. 

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, आज सकाळी हा अपघात घडला आहे, आगरतळाहून सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला सिग्नल तोडणाऱ्या मालगाडीने मागून धडक दिली. ट्रेनचा मागील गार्ड डब्बा, दोन पार्सल व्हॅन आणि जनरल कंपार्टमेंटचं नुकसान झालं आहे. बचावकार्य सुरू आहे. रेल्वेचे एडीआरएम, जिल्हा आणि राज्य प्रशासन, एनडीआरएफ, लष्कर बचाव कार्यासाठी तेथे पोहोचले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :railwayरेल्वेwest bengalपश्चिम बंगाल