शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

कलबुर्गी हत्याप्रकरण गंभीर स्वरूपाचे; सर्वोच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 04:20 IST

पुढील सुनावणी २६ फेब्रुवारीला

नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांचे हत्या प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले आहे. कलबुर्गी हत्येबाबत त्यांची पत्नी उमादेवी यांनी दाखल केलेल्या याचिकेची पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी रोजी होईल. ही सुनावणी पुढे ढकलण्याची महाराष्ट्र, कर्नाटक सरकारची विनंती न्यायालयाने अमान्य केली.दोन्ही राज्यांनी या खटल्यामधील आपली बाजू मांडण्याचे काम पूर्ण करावे व पुढील सुनावणीसाठी सज्ज राहावे, असा आदेश न्या. रोहिन्टन नरिमन व न्या. विनीत सरन यांच्या खंडपीठाने दिला आहे. गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणांमध्ये एक समान धागा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश उदय ललित यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेच होते.विवेकाचा आवाज दडपून टाकणाऱ्या प्रवृत्तींविरोधात न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याबद्दल काही जणांनी समाधानही व्यक्त केले होते. कर्नाटक सरकारची बाजू मांडणारे अ‍ॅड. देवदत्त कामत यांनी याआधी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूतील निवासस्थानी पत्रकार गौरी लंकेश व ३० ऑगस्ट २०१५ रोजी कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्येमध्ये एक समान धागा आहे. त्यावर उत्तर देण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे मुदत मागून घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.कडक शिक्षा करागोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गींची हत्या करणारे एकच असावेत, असा दावा उमादेवी कलबुर्गी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या हल्लेखोरांना कडक शिक्षा सुनावण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय