शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

‘मेक इन इंडिया’बाबत कलामांनी केले होते सावध

By admin | Updated: October 18, 2015 22:18 IST

दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे

नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे; पण त्यातून भारत स्वस्तात माल उत्पादित करण्याचा जगाचा कारखाना बनण्याचाच मोठा धोका आहे, असे कलामांना वाटत होते.कलाम यांचे निकटवर्तीय सृजप पाल यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅडव्हान्टेज इंडिया : फ्रॉम चॅलेंज टू अपॉर्च्युनिटी’ या पुस्तकात त्यांचे हे विचार मांडले आहेत. कलामांच्या या शेवटच्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होत आहे. तत्पूर्वी, या पुस्तकातील काही भाग समोर आला आहे. ‘हॉर्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात गत २७ जुलैला आयआयएम-शिलाँग येथे कलाम यांच्या अर्धवट राहिलेल्या भाषणाचाही समावेश आहे. आयआयएम-शिलाँग येथे भाषण सुरूअसतानाच कलाम मंचावर कोसळले होते. यानंतर काहीच वेळात त्यांचे निधन झाल्याची बातमी आली होती. रालोआ सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ केला होता. भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण स्थान तसेच उत्पादन, डिझाईन व नवकौशल्याचे एक जागतिक केंद्र बनविणे ‘मेक इन इंडिया’चा हेतू आहे. तथापि, कलामांच्या मनात या अभियानाबाबत साशंकता होती. ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, भारताला आणखी मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेची देशाला गरज आहेच; पण यामुळे भारत जगासाठी केवळ एक स्वस्त उत्पादन केंद्र बनून राहण्याचा धोका आहे. या विकासाच्या मोबदल्यात देशातील जनतेला मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असे मत कलाम यांनी मांडले आहे.भारतातील विकासात विसंगती आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. मात्र, अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही कलामांनी म्हटले आहे. ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे पलीकडून बोलणाऱ्या शेषन यांनी मला विचारले आणि माझ्या उत्तराची प्रतीक्षा न करताच, प्रक्षेपणाच्या विलंबासाठी अमेरिका व नाटोकडून प्रचंड दबाव असल्याचे मला सांगितले. यानंतर पुन्हा ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे त्यांनी मला विचारले. त्याक्षणी त्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते; पण आता याक्षणी मागे फिरता येणार नाही, असे विचारपूर्वक उत्तर मी दिले. यावर पलीकडून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होईल, असे मला वाटले. मात्र, शेषन यांनी एक दीर्घ श्वास घेत, ‘आगे बढ़िए’ असे सांगितले.यानंतर तीन तासांनी २२ मे १९८९ रोजी ‘अग्नी’चे यशस्वी प्रक्षेपण झाले, असे कलाम यांनी यात लिहिले आहे.