शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

‘मेक इन इंडिया’बाबत कलामांनी केले होते सावध

By admin | Updated: October 18, 2015 22:18 IST

दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे

नवी दिल्ली : दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ अभियानाबाबत साशंक होते. ‘मेक इन इंडिया’ अभियान महत्त्वाकांक्षी आहे; पण त्यातून भारत स्वस्तात माल उत्पादित करण्याचा जगाचा कारखाना बनण्याचाच मोठा धोका आहे, असे कलामांना वाटत होते.कलाम यांचे निकटवर्तीय सृजप पाल यांनी लिहिलेल्या ‘अ‍ॅडव्हान्टेज इंडिया : फ्रॉम चॅलेंज टू अपॉर्च्युनिटी’ या पुस्तकात त्यांचे हे विचार मांडले आहेत. कलामांच्या या शेवटच्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होत आहे. तत्पूर्वी, या पुस्तकातील काही भाग समोर आला आहे. ‘हॉर्पर कॉलिन्स इंडिया’ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात गत २७ जुलैला आयआयएम-शिलाँग येथे कलाम यांच्या अर्धवट राहिलेल्या भाषणाचाही समावेश आहे. आयआयएम-शिलाँग येथे भाषण सुरूअसतानाच कलाम मंचावर कोसळले होते. यानंतर काहीच वेळात त्यांचे निधन झाल्याची बातमी आली होती. रालोआ सरकारने गतवर्षी सप्टेंबरमध्ये ‘मेक इन इंडिया’चा शुभारंभ केला होता. भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण स्थान तसेच उत्पादन, डिझाईन व नवकौशल्याचे एक जागतिक केंद्र बनविणे ‘मेक इन इंडिया’चा हेतू आहे. तथापि, कलामांच्या मनात या अभियानाबाबत साशंकता होती. ‘मेक इन इंडिया’ महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, भारताला आणखी मोठ्या महत्त्वाकांक्षा बाळगण्याची गरज आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या मोहिमेची देशाला गरज आहेच; पण यामुळे भारत जगासाठी केवळ एक स्वस्त उत्पादन केंद्र बनून राहण्याचा धोका आहे. या विकासाच्या मोबदल्यात देशातील जनतेला मोठी किंमत चुकवावी लागू शकते, असे मत कलाम यांनी मांडले आहे.भारतातील विकासात विसंगती आहे. आज दूरसंचार आणि टेलिकॉम क्षेत्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. मात्र, अजूनही अनेक गावांपर्यंत वीज व रस्ते पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही कलामांनी म्हटले आहे. ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे पलीकडून बोलणाऱ्या शेषन यांनी मला विचारले आणि माझ्या उत्तराची प्रतीक्षा न करताच, प्रक्षेपणाच्या विलंबासाठी अमेरिका व नाटोकडून प्रचंड दबाव असल्याचे मला सांगितले. यानंतर पुन्हा ‘अग्नी’बाबत काय प्रगती आहे, असे त्यांनी मला विचारले. त्याक्षणी त्या प्रश्नाचे उत्तर देणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते; पण आता याक्षणी मागे फिरता येणार नाही, असे विचारपूर्वक उत्तर मी दिले. यावर पलीकडून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होईल, असे मला वाटले. मात्र, शेषन यांनी एक दीर्घ श्वास घेत, ‘आगे बढ़िए’ असे सांगितले.यानंतर तीन तासांनी २२ मे १९८९ रोजी ‘अग्नी’चे यशस्वी प्रक्षेपण झाले, असे कलाम यांनी यात लिहिले आहे.