शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

KTR On Rahul Gandhi: “आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठीत जिंकू शकले नाही, भावी पंतप्रधानांनी आधी...”; TRSचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 16:42 IST

KTR On Rahul Gandhi: भावी पंतप्रधानांनी आधी स्वतःच्या अमेठी मतदारसंघात निवडून येण्यासाठी स्थानिकांची पसंती मिळवावी, असा टोला लगावण्यात आला आहे.

KTR On Rahul Gandhi: आताच्या घडीला काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काहीच दिवसांनी ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, यातच तेलंगणा राष्ट्र समितीवरून भारत राष्ट्र समिती झालेल्या पक्षाच्या नेत्याने राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला आहे. 

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ तेलंगणात पोहचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशनंतर ही यात्रा तेलंगणा राज्यातून प्रवास करत आहे. काही दिवसांपूर्वी के चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलले होते. यावरून राहुल गांधी यांनी के. चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय भूमिकेचे स्वागत करतो. ते अमेरिका आणि चीनमध्ये निवडणूक लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करत आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला होता. याला के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के टी रामाराव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठीत जिंकू शकले नाही

तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांनी पलटवार करताना राहुल गांधींना ‘भावी पंतप्रधान’ संबोधले आहे. आंतरराष्ट्रीय नेते राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत आणि ते मुख्यमंत्री केसीआर यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेची खिल्ली उडवत आहेत. ‘भावी पंतप्रधान’ यांनी पहिल्यांदा खासदार म्हणून आपल्या लोकांतून निवडून यावे, अशी टीका के टी रामाराव यांनी केली आहे. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं नाही. हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. काँग्रेस हा निजामशाही पक्ष नाही. आठवा निजाम हैदराबादमध्ये बसला आहे, असा पलटवार काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी के टी रामराव यांच्यावर केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस