शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ज्योतिर्रादित्य शिंदे पोहोचले दिल्लीत, मोदींच्या कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 11:01 IST

मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देज्योतिर्रादित्य हे मालवा दौऱ्यावर असताना अचानक, मंगळवारी सकाळी त्यांना महाकाल यांचे दर्शन घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले. दिल्लीतून फोन आल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत.

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित जंबो मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन किंवा तीन मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.  भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, दुसरीकडे मध्य प्रदेशमधील भाजप नेते ज्योतिर्रादित्य शिंदे यांना मंत्रीमंडलात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. 

मध्य प्रदेशचे नेते आणि मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी सकाळीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, गेहलोत याच्या राजीनाम्यानंतर ज्योतिर्रादित्य शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यातच, ज्योतिर्रादित्य शिंदे दिल्लीत पोहोचले असून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतरच शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता, गेहलोत यांना राज्यपाल केल्यामुळे ही चर्चा अधिक बळकट झाली आहे. 

ज्योतिर्रादित्य हे मालवा दौऱ्यावर असताना अचानक, मंगळवारी सकाळी त्यांना महाकाल यांचे दर्शन घेऊन दिल्लीकडे प्रस्थान केले. दिल्लीतून फोन आल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळेच, शिंदे यांचे केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान निश्चित मानले जात आहे. दरम्यान, गेहलोत राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांची राज्यसभेतील जागाही आता रिक्त झाली असून, भाजपचे राज्यसभेतील नेते म्हणून पीयूष गोयल किंवा प्रकाश जावडेकर यांना संधी निर्माण मिळू शकेल. 

विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात ७ जागा रिक्त होत्या. तसेच उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातून राणेही पोहोचले दिल्लीत

महाराष्ट्राच्या वाट्याला 3 ते 4 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, नारायण राणे, प्रीतम मुंडे, कपिल पाटील दिल्लीत पोहचले आहेत. डॉ, भागवत कराड दिल्लीमध्ये आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात अल्पसंख्याकांनाही सामावून घेण्यात येऊ शकते. नारायण राणेंनी दिल्लीत पोहतचाच पत्रकारांनी त्यांना घेरले होते. त्यावेळी बोलताना लवकरच आपल्याला सर्वकाही सांगेन, असे राणेंनी म्हटलं. 

या नेत्यांना मिळणार स्थान

मिळालेल्या माहितीनुसार, रिटा बहुगुणा जोशी, रामेश्वर कथेरिया, राहुल कासवान, सी. पी. जोशी, प्रवेश वर्मा किंवा मीनाक्षी लेखी, झफर इस्लाम, अश्वनी वैष्णव, पूनम महाजन, हिना गावित, प्रीतम मुंडे आणि डॉ. भागवत कराड यांना स्थान मिळेल, असे सांगण्यात येत आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह सुशील मोदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव, दिलीप घोष या भाजप नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजप पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  

मोहन भागवतांनी दिले होते संकेत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात वक्तव्य केले होते. मंत्रिमंडळात इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंदिया, रिटा बहुगुणा जोशी, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांना तसेच युतीतील घटक पक्षांना स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच मोदी सरकारमधून काही मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर किमान ५-६ मंत्र्यांना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेdelhiदिल्ली