शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काँग्रेस टप्प्याटप्प्याने राबविणार न्याय योजना : पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:20 IST

देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.

चेन्नई : देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. त्याद्वारे सर्व लाभार्थी कुटुंबांना सामावून घेतले जाईल असे माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, काँग्रेसने या योजनेची आखणी करताना अनेक अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत केली होती. ही योजना राबविण्यास भारत सक्षम आहे असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील या योजनेविषयी अनुकूल मत व्यक्त केले होते. या योजनेसाठी येणारा खर्च राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या फक्त १.८ टक्के इतकाच असेल. न्याय योजना टप्प्याटप्प्याने राबवून सर्व लाभार्थींना त्यात सहभागी करून घेतले जाईल.चिदम्बरम म्हणाले की, न्याय योजना देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल. त्यानंतर तिचा विस्तार केला जाईल. तिच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ मंडळींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यातील अंमलबजावणीवर ही समित बारीक लक्ष ठेवेल. न्याय योजनेचा पुढचा टप्पा अमलात आणण्याआधी या समितीचा सल्ला घेतला जाईल.जेटलींच्या टीकेचा घेतला समाचारपी. चिदम्बरम यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वात गरीब ५ कोटीकुटुंबे शोधून काढण्यासाठी पुरेशी आकडेवारीही उपलब्ध आहे. १०० दिवस रोजगार देणारी मनरेगा योजना अंमलात आणण्याचा निर्णय यूपीए सरकारने २००९ साली घेतला होता. त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी होणे अशक्यप्राय आहे अशी टीका त्यावेळी भाजपा नेते व विद्यमान वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. याच पद्धतीने जेटलींनी न्याय योजनेवरही टीका केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली त्यावेळी तसे होणे अशक्य आहे हे सांगायला मात्र जेटली सोयीस्कररित्या विसरले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम