शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

काँग्रेस टप्प्याटप्प्याने राबविणार न्याय योजना : पी. चिदम्बरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 05:20 IST

देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.

चेन्नई : देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी न्यूनतम आय योजना (न्याय योजना) टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल. त्याद्वारे सर्व लाभार्थी कुटुंबांना सामावून घेतले जाईल असे माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, काँग्रेसने या योजनेची आखणी करताना अनेक अर्थतज्ज्ञांशी सल्लामसलत केली होती. ही योजना राबविण्यास भारत सक्षम आहे असे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देखील या योजनेविषयी अनुकूल मत व्यक्त केले होते. या योजनेसाठी येणारा खर्च राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या फक्त १.८ टक्के इतकाच असेल. न्याय योजना टप्प्याटप्प्याने राबवून सर्व लाभार्थींना त्यात सहभागी करून घेतले जाईल.चिदम्बरम म्हणाले की, न्याय योजना देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल. त्यानंतर तिचा विस्तार केला जाईल. तिच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ मंडळींची समिती स्थापन करण्यात येणार आहे. योजनेच्या प्रत्येक टप्प्यातील अंमलबजावणीवर ही समित बारीक लक्ष ठेवेल. न्याय योजनेचा पुढचा टप्पा अमलात आणण्याआधी या समितीचा सल्ला घेतला जाईल.जेटलींच्या टीकेचा घेतला समाचारपी. चिदम्बरम यांनी सांगितले की, देशामध्ये सर्वात गरीब ५ कोटीकुटुंबे शोधून काढण्यासाठी पुरेशी आकडेवारीही उपलब्ध आहे. १०० दिवस रोजगार देणारी मनरेगा योजना अंमलात आणण्याचा निर्णय यूपीए सरकारने २००९ साली घेतला होता. त्यावेळी या योजनेची अंमलबजावणी होणे अशक्यप्राय आहे अशी टीका त्यावेळी भाजपा नेते व विद्यमान वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली होती. याच पद्धतीने जेटलींनी न्याय योजनेवरही टीका केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली त्यावेळी तसे होणे अशक्य आहे हे सांगायला मात्र जेटली सोयीस्कररित्या विसरले होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम