शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:10 IST

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.

अयोध्या प्रकरणावर निकाल समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रचूड म्हणाले की, या निर्णयावर अनेक टीकाकार आहेत, परंतु त्यांनी संपूर्ण १००० पानांचा निर्णय वाचलेला नाही. हा निर्णय केवळ वस्तुस्थितीवर आधारित आहे.

न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांनाही चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.नरीमन यांनी  अयोध्या निकालाला न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले होते. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, हा निकाल पुराव्याच्या तपशीलवार विश्लेषणावर आधारित होता आणि आता त्यावर काहीही दावा करणे वस्तुस्थितीनुसार योग्य नाही. काल डीवाय चंद्रचूड टाइम्स नेटवर्कच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी या प्रश्नांना उत्तर दिली.

फक्त छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती रोहिंगटन नरिमन यांच्या प्रश्नांना उत्तर दिले, चंद्रचूड म्हणाले, निकालात धर्मनिरपेक्षतेला स्थान दिलेले नाही. मी या निर्णयाचा पक्ष होतो आणि आता त्यावर टीका करणे किंवा बाजू घेणे माझे काम नाही. आता हा निर्णय सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर इतरच बोलतील.

न्यायमूर्ती नरिमन यांच्या विधानाला उत्तर देताना डी वाय चंद्रचूड म्हणाले की, ते स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत आणि त्यांची टीका ही धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे भारतात जिवंत असल्याचे समर्थन करते, कारण धर्मनिरपेक्षतेचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे विवेकाचे स्वातंत्र्य.

चंद्रचूड म्हणाले की, आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे आपले आंतरिक विचार सर्वांसमोर ठेवतात. यावरून देशात धर्मनिरपेक्षता जिवंत असल्याची आठवण होते. मी आता माझ्या निर्णयाचा बचाव करू इच्छित नाही, कारण मी ते करू शकत नाही. आम्ही पाच न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला आणि युक्तिवादही केला. त्यामुळे प्रत्येक न्यायाधीश या निर्णयाचा एक भाग असतो आणि आम्ही आमच्या निर्णयाच्या प्रत्येक शब्दावर ठाम आहोत.

चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या व्यापक भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, संविधान हे केवळ राजकीय दस्तावेज नसून सामाजिक परिवर्तनाचे व्हिजन डॉक्युमेंट आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडCourtन्यायालय