शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अयोध्या निर्णयावर न्यायमूर्ती नरिमन यांनी उपस्थित केले होते प्रश्न; आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:10 IST

अयोध्या केसच्या निर्णयावर न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनी प्रश्न उपस्थित केले होते, या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.

अयोध्या प्रकरणावर निकाल समोर आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना आता माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चंद्रचूड म्हणाले की, या निर्णयावर अनेक टीकाकार आहेत, परंतु त्यांनी संपूर्ण १००० पानांचा निर्णय वाचलेला नाही. हा निर्णय केवळ वस्तुस्थितीवर आधारित आहे.

न्यायमूर्ती रोहिंगटन नरीमन यांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांनाही चंद्रचूड यांनी उत्तर दिले आहे.नरीमन यांनी  अयोध्या निकालाला न्यायाची थट्टा असल्याचे म्हटले होते. माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, हा निकाल पुराव्याच्या तपशीलवार विश्लेषणावर आधारित होता आणि आता त्यावर काहीही दावा करणे वस्तुस्थितीनुसार योग्य नाही. काल डीवाय चंद्रचूड टाइम्स नेटवर्कच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते, यावेळी त्यांनी या प्रश्नांना उत्तर दिली.

फक्त छळ आत्महत्येस प्रवृत्त करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती रोहिंगटन नरिमन यांच्या प्रश्नांना उत्तर दिले, चंद्रचूड म्हणाले, निकालात धर्मनिरपेक्षतेला स्थान दिलेले नाही. मी या निर्णयाचा पक्ष होतो आणि आता त्यावर टीका करणे किंवा बाजू घेणे माझे काम नाही. आता हा निर्णय सार्वजनिक मालमत्ता असून त्यावर इतरच बोलतील.

न्यायमूर्ती नरिमन यांच्या विधानाला उत्तर देताना डी वाय चंद्रचूड म्हणाले की, ते स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत आणि त्यांची टीका ही धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे भारतात जिवंत असल्याचे समर्थन करते, कारण धर्मनिरपेक्षतेचे एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे विवेकाचे स्वातंत्र्य.

चंद्रचूड म्हणाले की, आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे आपले आंतरिक विचार सर्वांसमोर ठेवतात. यावरून देशात धर्मनिरपेक्षता जिवंत असल्याची आठवण होते. मी आता माझ्या निर्णयाचा बचाव करू इच्छित नाही, कारण मी ते करू शकत नाही. आम्ही पाच न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल दिला आणि युक्तिवादही केला. त्यामुळे प्रत्येक न्यायाधीश या निर्णयाचा एक भाग असतो आणि आम्ही आमच्या निर्णयाच्या प्रत्येक शब्दावर ठाम आहोत.

चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांच्या व्यापक भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, संविधान हे केवळ राजकीय दस्तावेज नसून सामाजिक परिवर्तनाचे व्हिजन डॉक्युमेंट आहे.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडCourtन्यायालय