शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पाळीव कुत्र्याच्या मृत्युमुळे जजसाहेब भडकले, पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली अशी मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 12:44 IST

Court News: दिल्ली हायकोर्टामधून कलकत्ता हायकोर्टामध्ये बदली झालेले न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी दिल्ली पोलिसांचे जॉईंट पोलीस कमिश्नर (सिक्युरिटी) यांना पत्र लिहिलं आहे.

दिल्ली हायकोर्टामधून कलकत्ता हायकोर्टामध्ये बदली झालेले न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी दिल्लीपोलिसांचे जॉईंट पोलीस कमिश्नर (सिक्युरिटी) यांना पत्र लिहिलं आहे. न्यायमूर्ती कंठ यांनी आरोप केला की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी आपातकालिन परिस्थितीत बंगल्याचा दरवाजा उघडण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी पत्रातून केला. दरम्यान, कंठ यांनी जेसीपीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांविरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जस्टिस कंठ यांनी यांनी आपल्या पत्रात लिहिले की, मी हे पत्र खूप दु:खी आणि क्रोधित अंत:करणाने लिहित आहे. माझ्या बंगल्याच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या अयोग्यतेमुळे माझ्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. मी बंगल्यावर तैनात सुरक्षा रक्षकांना दरवाजा बंद ठेवण्याबाबत सातत्याने सांगत होतो. मात्र त्यांनी माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं. तसेच आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. कर्तव्यावरील अशा प्रकारची अपात्रता आणि दुर्लक्षावर तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अशा बेफिकीरीमुळे माझ्यासोबतही कुठलीही दुर्घटना होऊ शकते. मी स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंतीत आहे. अशा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं, अशी मी तुमच्याकडे मागणी करतो.  

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्लीPoliceपोलिस