शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

...ही तर फक्त सुरुवात; शेतकऱ्यांना कुणीच रोखू शकत नाही: राहुल गांधी

By मोरेश्वर येरम | Updated: November 27, 2020 16:46 IST

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांचं ऐकावच लागेल, राहुल गांधी कडाडलेशेतकऱ्यांना जगातील कोणतंच सरकार रोखू शकत नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा"शेतकऱ्यांवर घाव घालणारे कायदे मोदींना मागे घ्यावेच लागतील"

नवी दिल्लीकेंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी धोरणांच्याविरोधात 'चलो दिल्ली' आंदोलनत सहभागी झालेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रू धुराचाराही वापर करण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. 

''पंतप्रधानांनी लक्षात ठेवायला हवं जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या या लढाईत उतरलेल्या शेतकऱ्यांना जगातील कोणतच सरकार रोखू शकत नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावच लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे'', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरुन या शेतकऱ्यांना अटक करता येईल. पण दिल्ली सरकारने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे. 

''केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं पाप आम्ही करू शकत नाही'', असं दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. 

पंजाबमधून निघालेले शेतकरी हरियाणातून दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाले होते. काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी पानीपतपर्यंत पोहोचले होते. आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेत प्रवेश केला आहे. दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सिंधू सीमेवर झटापट झाली. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर करण्यात आला. पण या सगळ्याला न जुमानता शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीcongressकाँग्रेस