शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 10:43 IST

जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे.

मुंबई- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'जिरो बॅलेन्स-जिरो चार्ज'चं अकाऊंट सुरू करण्यासाठी खूप प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीरो बॅलेन्सचं जन-धन खातं सुरू करावं, यासाठी आपल्या भाषणातूनही लोकांना सांगितलं. पण आता जन-धन खात्याशी संबंधीत एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, बेसिक सेव्हिग्स बँक अकाऊंट ज्यामध्ये पंतप्रधान जन-धन योजनेचाही सहभाग आहे ते अकाऊंट्स फ्रीज होणं व नंतर सुरळीत होण्याचा धोका आहे. 

खरंतर या अकाऊंटला महिन्यातून चार व्यवहार केले जाऊ शकतात. ज्यावर कुठलीही बँक कुठलाही चार्ज आकारू शकत नाही. चार व्यवहारांनंतर बँक चार्ज लावू शकते. पण आता चार व्यवहारा पूर्ण झाल्यावर बँकेकडून ही खाती फ्रीज केली जात आहेत. तर दुसरीकडे, एचडीएफसी, सिटी बँक अशा बँका चार व्यवहारांनंतर ही खाती सामान्य खात्यामध्ये बदलते आहे. जन-धन खातं रेग्युलर झालं तर त्या खात्यात मिनिमम बॅलेन्स ठेवला नाही तर अकाऊंट धारकांना पेनल्टी भरायला लागते. 

इतकंच नाही, तर बँकांनी फ्री ट्रॅन्झॅक्शनच्या व्याख्येलाही पूर्ण बदललं आहे. यामध्ये फक्त एटीएममधून काढलेले पैसे नाही तर, आरटीजीएस, एनइएफटी, ब्रॅन्च विड्रॉवल, इएमआयचाही सहभाग केला जातो आहे. खातं सुरू केल्यावर जर ग्राहकाने सुरूवातीला चार व्यवहार केले तर नंतर पुन्हा पैसे काढण्यासाठी त्या व्यक्तीला पुढच्या महिन्याची वाट पाहावी लागते आहे. 

दरम्यान, ही संपूर्ण माहिती आयआयची मुंबईच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक ऑफ इंडिया त्यांच्याकडील खातं फ्रीज करते आहे. तर एचडीएफसी आणि सिटी बँक ही खाती रेग्युलर खात्यात बदलते आहे. आयसीआयसीआय बँकेने पाचव्या व्यवहारावर चार्ज घ्यायला सुरूवात केली होती पण विरोधानंतर हा चार्ज बंद करण्यात आला. 

टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाEconomyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदी