शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

By admin | Updated: June 4, 2016 02:42 IST

मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टी आणि भाजपासह संपूर्ण विरोधकांनी समाजवादी पार्टीच्या सरकारवर मनमानीपणाचा आरोप लावून मुख्यमंत्री यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मथुरेतील घटना दुर्दैवी असल्याचे सांगून राज्यातील कायदा व व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचा आरोप केला. जवाहरबाग येथील घटना हे याचे उदाहरण असल्याचे मत त्यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना परिसरात शांतता प्रस्थापित करून दोषींवर कडक कारवाईची मागणी गांधी यांनी केली. बसपा प्रमुख मायावती यांनी ही घटना सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. धरण्याच्या निमित्ताने कब्जाअतिक्रमणकर्ते बाबा जयगुरुदेव समूहाचे असण्याची शंका आहे. धरण्याच्या बहाण्याने त्यांनी या जागेवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करा, विद्यमान चलनाच्या जागी आझाद हिंद फौजेचे चलन आणा आदी मागण्या ते करीत होते. याशिवाय एका रुपयात ६० लिटर डिझेल आणि ४० लिटर पेट्रोलची त्यांची मागणी होती. रामवृक्ष यादव, चंदन बोस, गिरीश यादव आणि राकेश गुप्ता हे मुख्य आरोपी आणि समूहाचे म्होरके असून जिवंत असल्यास त्यांना पकडण्यात येईल, असे महासंचालकांनी सांगितले. भाजपाने विचारले प्रश्न 1. या घटनेत वापरलेली शस्त्रास्त्रे तेथे आली कशी?2. सूत्रधाराबद्दल संपूर्ण माहिती असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही. 3. राज्यात पोलीसच सुरक्षित नाही मग जनतेचे काय?4. सपाचे सरकार आल्यापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात तीन पट वाढ झाली आहे. त्याचे काय?हेमा मालिनी शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्तमथुरेत हिंसाचार झाला असतानाही या क्षेत्रातील भाजपा खासदार हेमा मालिनी या मात्र टिष्ट्वटरवर चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे पक्षाला खजील व्हावे लागले. सोशल मीडियावर टीका होताच त्यांनी लगेच हे फोटो हटवून शहीद अधिकाऱ्यांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. अर्थात भाजपाने मात्र हेमा मालिनींची पाठराखण करताना त्या या घटनेबाबत संवेदनशील असल्याचा दावा केला. यावर राजकारण करू नये, असे मत प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.