शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

By admin | Updated: June 4, 2016 02:42 IST

मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टी आणि भाजपासह संपूर्ण विरोधकांनी समाजवादी पार्टीच्या सरकारवर मनमानीपणाचा आरोप लावून मुख्यमंत्री यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मथुरेतील घटना दुर्दैवी असल्याचे सांगून राज्यातील कायदा व व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचा आरोप केला. जवाहरबाग येथील घटना हे याचे उदाहरण असल्याचे मत त्यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना परिसरात शांतता प्रस्थापित करून दोषींवर कडक कारवाईची मागणी गांधी यांनी केली. बसपा प्रमुख मायावती यांनी ही घटना सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. धरण्याच्या निमित्ताने कब्जाअतिक्रमणकर्ते बाबा जयगुरुदेव समूहाचे असण्याची शंका आहे. धरण्याच्या बहाण्याने त्यांनी या जागेवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करा, विद्यमान चलनाच्या जागी आझाद हिंद फौजेचे चलन आणा आदी मागण्या ते करीत होते. याशिवाय एका रुपयात ६० लिटर डिझेल आणि ४० लिटर पेट्रोलची त्यांची मागणी होती. रामवृक्ष यादव, चंदन बोस, गिरीश यादव आणि राकेश गुप्ता हे मुख्य आरोपी आणि समूहाचे म्होरके असून जिवंत असल्यास त्यांना पकडण्यात येईल, असे महासंचालकांनी सांगितले. भाजपाने विचारले प्रश्न 1. या घटनेत वापरलेली शस्त्रास्त्रे तेथे आली कशी?2. सूत्रधाराबद्दल संपूर्ण माहिती असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही. 3. राज्यात पोलीसच सुरक्षित नाही मग जनतेचे काय?4. सपाचे सरकार आल्यापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात तीन पट वाढ झाली आहे. त्याचे काय?हेमा मालिनी शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्तमथुरेत हिंसाचार झाला असतानाही या क्षेत्रातील भाजपा खासदार हेमा मालिनी या मात्र टिष्ट्वटरवर चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे पक्षाला खजील व्हावे लागले. सोशल मीडियावर टीका होताच त्यांनी लगेच हे फोटो हटवून शहीद अधिकाऱ्यांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. अर्थात भाजपाने मात्र हेमा मालिनींची पाठराखण करताना त्या या घटनेबाबत संवेदनशील असल्याचा दावा केला. यावर राजकारण करू नये, असे मत प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.