शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

‘जंगल राज’नव्हे ‘गुंडा राज’!

By admin | Updated: June 4, 2016 02:42 IST

मथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीमथुरेत पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांदरम्यान हिंसक संघर्षानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वादळ आले असून विरोधी पक्षांनी अखिलेश यादव सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राज्य विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष बहुजन समाज पार्टी आणि भाजपासह संपूर्ण विरोधकांनी समाजवादी पार्टीच्या सरकारवर मनमानीपणाचा आरोप लावून मुख्यमंत्री यादव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मथुरेतील घटना दुर्दैवी असल्याचे सांगून राज्यातील कायदा व व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली असल्याचा आरोप केला. जवाहरबाग येथील घटना हे याचे उदाहरण असल्याचे मत त्यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. या हिंसाचारात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त करताना परिसरात शांतता प्रस्थापित करून दोषींवर कडक कारवाईची मागणी गांधी यांनी केली. बसपा प्रमुख मायावती यांनी ही घटना सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे सांगून घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. धरण्याच्या निमित्ताने कब्जाअतिक्रमणकर्ते बाबा जयगुरुदेव समूहाचे असण्याची शंका आहे. धरण्याच्या बहाण्याने त्यांनी या जागेवर कब्जा केला होता. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची निवडणूक रद्द करा, विद्यमान चलनाच्या जागी आझाद हिंद फौजेचे चलन आणा आदी मागण्या ते करीत होते. याशिवाय एका रुपयात ६० लिटर डिझेल आणि ४० लिटर पेट्रोलची त्यांची मागणी होती. रामवृक्ष यादव, चंदन बोस, गिरीश यादव आणि राकेश गुप्ता हे मुख्य आरोपी आणि समूहाचे म्होरके असून जिवंत असल्यास त्यांना पकडण्यात येईल, असे महासंचालकांनी सांगितले. भाजपाने विचारले प्रश्न 1. या घटनेत वापरलेली शस्त्रास्त्रे तेथे आली कशी?2. सूत्रधाराबद्दल संपूर्ण माहिती असतानाही त्याला अटक का करण्यात आली नाही. 3. राज्यात पोलीसच सुरक्षित नाही मग जनतेचे काय?4. सपाचे सरकार आल्यापासून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात तीन पट वाढ झाली आहे. त्याचे काय?हेमा मालिनी शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्तमथुरेत हिंसाचार झाला असतानाही या क्षेत्रातील भाजपा खासदार हेमा मालिनी या मात्र टिष्ट्वटरवर चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो अपलोड करण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे पक्षाला खजील व्हावे लागले. सोशल मीडियावर टीका होताच त्यांनी लगेच हे फोटो हटवून शहीद अधिकाऱ्यांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली. अर्थात भाजपाने मात्र हेमा मालिनींची पाठराखण करताना त्या या घटनेबाबत संवेदनशील असल्याचा दावा केला. यावर राजकारण करू नये, असे मत प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.