शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

JNU Attack: 'हिंसाचार घडत असताना पोलिसांना बघ्याची भूमिका घेण्याचे आदेश होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:04 IST

त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनाबद्दल पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. कारण केंद्र सरकार दिल्ली पोलिसांना ज्याप्रकारे आदेश देते त्याप्रमाणे ते काम करतात. त्यामुळे दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराच्या घटनामध्ये पोलिसांची चूक नसल्याचे केजरीवाल म्हणाले आहे.

दिल्लीतील जे काही घडत आहे त्याबद्दल पोलिसांना मी दोषी समजत नाही. कारण हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर घडू द्या, हल्लेखोरांना हल्ले करून जाऊ द्या त्यांनतर तुम्ही घटनास्थळी पोहचले पाहिजे, असे आदेश पोलिसांना वरून दिले जात असल्याचे आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी विचार केला तर, राज्यातील गुन्हेगारीला ते लगाम लावू शकतात. मात्र पोलिसांना गुन्हा घडत असताना कारवाई न करण्याचे आदेश वरून दिले जात आहे. त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाली आहेत. तर दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या ह्ल्ल्याची घटना या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरत आहे. यावरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे.