शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

JNU Attack: 'हिंसाचार घडत असताना पोलिसांना बघ्याची भूमिका घेण्याचे आदेश होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:04 IST

त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनाबद्दल पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. कारण केंद्र सरकार दिल्ली पोलिसांना ज्याप्रकारे आदेश देते त्याप्रमाणे ते काम करतात. त्यामुळे दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराच्या घटनामध्ये पोलिसांची चूक नसल्याचे केजरीवाल म्हणाले आहे.

दिल्लीतील जे काही घडत आहे त्याबद्दल पोलिसांना मी दोषी समजत नाही. कारण हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर घडू द्या, हल्लेखोरांना हल्ले करून जाऊ द्या त्यांनतर तुम्ही घटनास्थळी पोहचले पाहिजे, असे आदेश पोलिसांना वरून दिले जात असल्याचे आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी विचार केला तर, राज्यातील गुन्हेगारीला ते लगाम लावू शकतात. मात्र पोलिसांना गुन्हा घडत असताना कारवाई न करण्याचे आदेश वरून दिले जात आहे. त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाली आहेत. तर दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या ह्ल्ल्याची घटना या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरत आहे. यावरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे.