शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

JNU Attack: 'हिंसाचार घडत असताना पोलिसांना बघ्याची भूमिका घेण्याचे आदेश होते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 17:04 IST

त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत घडत असलेल्या हिंसाचाराच्या घटनाबद्दल पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. कारण केंद्र सरकार दिल्ली पोलिसांना ज्याप्रकारे आदेश देते त्याप्रमाणे ते काम करतात. त्यामुळे दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराच्या घटनामध्ये पोलिसांची चूक नसल्याचे केजरीवाल म्हणाले आहे.

दिल्लीतील जे काही घडत आहे त्याबद्दल पोलिसांना मी दोषी समजत नाही. कारण हिंसाचाराच्या घटना घडत असतील तर घडू द्या, हल्लेखोरांना हल्ले करून जाऊ द्या त्यांनतर तुम्ही घटनास्थळी पोहचले पाहिजे, असे आदेश पोलिसांना वरून दिले जात असल्याचे आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली पोलीस हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम आहेत. त्यांनी विचार केला तर, राज्यातील गुन्हेगारीला ते लगाम लावू शकतात. मात्र पोलिसांना गुन्हा घडत असताना कारवाई न करण्याचे आदेश वरून दिले जात आहे. त्यांनी तसे केले नाही तर त्यांची नौकरी जाऊ शकते. त्यामुळे इच्छाशक्ती नसतानाही त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे महत्वाच्या पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाली आहेत. तर दिल्लीतील जेएनयूमध्ये झालेल्या ह्ल्ल्याची घटना या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरत आहे. यावरून भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे.