शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिओचे साईडइफेक्ट...! इनकमिंगसाठीही पैसे मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:49 IST

रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले.

मुंबई : रिलायन्स जिओने दोन वर्षांत भारतीय ग्राहकांना इंटरनेट आणि कॉलिंग खूपच स्वस्त केल्याने इतर कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. याआधी खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या कंपन्या मेटाकुटीला आल्या असून इनकमिंग कॉलसाठी पैसे आकारण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. 

रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. जिओला टक्कर देण्यासाठी या कंपन्यांनी जिओसारखेच टेरिफ प्लॅन जाहीर केले आणि कंपन्यांचा फायदा कमी होऊ लागला. व्होडाफोन आयडीयाला नुकताच 5 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

यामुळे या कंपन्यांनी ग्राहकांना मोफत इनकमिंगची सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. इनकमिंगसाठी ग्राहकांना कमीतकमी 35 रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. याद्वारे कंपन्या उत्पन्न वाढविणार आहेत. ग्राहकांनी रिचार्ज न केल्यास त्यांची सेवा बंद करण्यात येणार आहे.

यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 35 रुपयांचे रिचार्ज सक्तीचे केले आहे. हे रिचार्ज केल्यास 26 रुपयांचा टॉकटाईम आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. 28 दिवसांनंतर पुरेसा बॅलंस जरी असला तरीही ग्राहकाची आऊटगोईंग सुविधा बंद करण्यात येणार आहे. यानंतर काही काळाने इनकमिंग सेवा बंद करण्यात येणार आहे.  

टॅग्स :JioजिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेल