शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, पाच टप्प्यात होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:08 IST

महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर आता झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार असून, 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेमधून झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. झारखंडमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. 30 नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा,  7 डिसेंबर रोजी दुसरा टप्पा, 12 डिसेंबर रोजी तिसरा टप्पा, 16 डिसेंबर रोजी चौथा टप्पा आणि 20 डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान  होईल. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.''  

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. सध्या राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आहे. राज्यात काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे प्रमुख विरोधी पक्ष आहेत. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जेव्हएम, बीएसपी, एजेएसयू हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असतील. 

झारखंड विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल

भाजपा - 49 

एजेएसयू - 3 

झारखंड मुक्ती मोर्चा - 17

 काँग्रेस - 5

जेव्हीएम (पी) -1

सीपीआय (एमएल) -1 

बीएसपी - 1

एमससी -1 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019