शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

झारखंडचे हेमंत सोरेन सरकार अलर्ट मोडवर; राजकीय भूकंपाचे संकेत, राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 06:19 IST

झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत.

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क

रांची:झारखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील राजकीय स्थिती पाहता आमदारांना राजधानीच्या परिसरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी काही दिवसांत संभाव्य घटनाक्रमाशी जोडून याकडे पाहिले जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, आगामी काही दिवस फार महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्तारूढ महागठबंधनच्या पक्षांची शनिवारी बैठक बोलावली आहे व सरकार अलर्ट मोडवर आले आहे. 

काँग्रेसने आमदारांना २० तारखेपर्यंत राज्यात राहण्यास सांगितले आहे.  तर दुसरीकडे झामुमो आमदारही संपर्कात आहेत. या घडामोडी सुरू असताना विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो व झामुमो आ. निरल पूर्ती यांनी त्यांचा कॅनडा दौरा रद्द केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत आमदारांनी मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलाविल्याची माहिती संसदीय कार्यमंत्र्यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या नावे खाण लीज प्रकरणात आयोगाने सुनावणी पूर्ण केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, या प्रकरणात भाजप नेता व मुख्यमंत्र्यांनी लिखित बाजू सादर केलेली आहे. आयोगाने निर्णय राखून ठेवला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष

निवडणूक आयोग कधीही निर्णय देऊ शकते. आयोग आपल्या निर्णयाबाबत राज्यपालांना अवगत करील. त्याच्या आधारे राज्यपाल कारवाई करतील. विशेष म्हणजे भाजप नेत्यांच्या तक्रारीवरून राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडून मत मागितले आहे. हेमंत सोरेन यांच्या नावे दगडी खाण लीजवर देण्याच्या आधारावर त्यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर राज्यपालांनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठविले आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण