शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षांनंतर पती पोहोचला घरी; 'विधवा पत्नी'ला बसला धक्का अन् मग घडला अनपेक्षित प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:13 IST

साधूच्या वेशात हातात सारंगी घेऊन भिक्षा मागत पती पोहोचला स्वत:च्या घरी

झारखंडमध्ये घडलेल्या एका घटनेची परिसरात चर्चा आहे. एका महिलेला पती २२ वर्षांनी अचानक जिवंत होऊन परतला. पती मृत पावल्याचं समजून विधवेचं जीवन जगणाऱ्या महिलेनं पतीला जिवंत पाहिले. पतीला बघून तिला धक्का बसला. विशेष म्हणजे महिलेचा पती साधूच्या वेशात होता. त्याच्या हातात सारंगी होती. तो भिक्षा गोळा करत होता. या घटनेची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे. 

गढवा जिल्ह्यातल्या कांडी प्रखंडमधील सेमौरा गावात वास्तव्यास असलेल्या उदय यांनी २२ वर्षांपूर्वी घर सोडलं. कुटुंबियांनी त्यांचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अनेक महिने उलटले. उदय यांचा एखाद्या दुर्घटनेत मृत पावले असावेत असा कुटुंबियांचा समज झाला. त्यानंतर उद यांची पत्नी विधवा म्हणून जगू लागली. 

२२ वर्षांनंतर पत्नीसमोर उदय येऊन उभे ठाकले. त्यांनी साधूचा वेष परिधान केला होता. त्यांच्या हातात सारंगी होती. पत्नी भिक्षा मागत ते गोरखनाथाचे भजन गाऊ लागले. उदय यांच्या पत्नीनं पतीला ओळखलं. २२ वर्षांनंतर पतीला पाहिल्यानं तिला रडू कोसळलं. मात्र उदय यांनी स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी काही ग्रामस्थदेखील तिथे पोहोचले. त्यांनीही उदय यांना ओळखलं.

शेवटी उदय यांनी पत्नीला आपली खरी ओळख सांगितली आणि भिक्षेची मागणी केली. पत्नीकडून भिक्षा न मिळाल्यास सिद्धी प्राप्त होणार नाही. मला माझ्या कर्तव्याचं पालन करू दे, असा आग्रह उदय यांनी धरला. जमलेल्या ग्रामस्थांनी उदय यांना कुटुंबासोबत राहण्याची विनंती केली. मात्र त्यांनी नकार दिला आणि गावाबाहेर असलेल्या एका महाविद्यालयात आश्रय घेतला. पत्नीकडून भिक्षा न मिळाल्यानं उदय सध्या परिसरातच भटकत आहेत.