शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
4
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
5
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
6
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
7
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
8
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
9
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
10
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
11
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
12
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
Indian Railways Crisis: '...तर रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते, थकव्यामुळे धोका वाढवतोय;' आता लोको पायलट्सनं दिला इशारा
14
IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री
15
Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
16
आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
17
शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
18
वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात यावं लागलं; आज बनले YouTube चे सर्वात मोठे बॉस
19
बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
20
लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडच्या निवडणुकीत भाजपला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:04 IST

८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे.

रांची : ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने ६५ जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयू आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. महागठबंधनचे आव्हान वेगळेच आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून, ३० नोव्हेंबरपासून मतदानास सुरुवात होईल. त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे.लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर ५० जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपला झटका बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता भाजपकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयूने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपची कोंडी केली.भाजपने आपल्या सहकारी पक्षांमधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात विरोधकांनी कोणताही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या राज्यात भाजपला बेरोजगारी, शेती व आर्थिक मंदी यासारख्या मुद्यावर जनमताला बरोबर घेणे तारेवरची कसरत करण्यासारखे ठरणार आहे.राज्यात सरकारविरोधी जनमत नाहीच. विरोधकांची अनेक शकले पडली आहे, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले. महाराष्टÑात भाजप व शिवसेना यांची ३० वर्षांची युती तुटल्याचा काही परिणाम झारखंडमध्ये होईल का, असे विचारले असता एका नेत्याने सांगितले की, महाराष्टÑासारखी स्थिती येथे येऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. बंडखोरांनी भाजपची मते कमी करू नयेत, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. लोजपा व जदयू येथे स्वबळावर लढले तरी पक्षाला चिंता नाही, कारण केंद्रात हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये आहेत.मागील निवडणुकीत भाजपने ३७ जागा, तर एजेएसयूने ५ जागा जिंकल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा पक्ष स्वबळावर लढत आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019