शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान;  २३ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 01:09 IST

झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे

नवी दिल्ली : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३0 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. या नक्षलग्रस्त राज्यामध्ये मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला होईल. त्यानंतरच्या चार टप्प्यांत ७, १२, १६ व २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या नक्षलग्रस्त राज्यात २०१४ साली झालेली विधानसभा निवडणूकही पाच टप्प्यांत पार (पान ९ वर) पडली होती.आदिवासीबहुल झारखंडमध्ये सध्या भाजप सत्तास्थानी आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांना सत्तेवरून घालविण्यासाठी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह अन्य विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात २०, तिसºया टप्प्यात १७, चौथ्या टप्प्यात १५, पाचव्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच, राज्यामध्ये आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. महाराष्ट्र, हरयाणामधील विधानसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत १४ पैकी १0 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

भाजप सत्ता राखणार?झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. मात्र मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कारकीर्दीत झारखंडचा अजिबात विकास झाला नाही अशी टीका विरोधकांकडून होत असते. रघुबर दास हे झारखंडमध्ये पाच वर्षे पूर्ण करू शकणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी तिथे अस्थिर सरकारे अस्तित्वात होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग