शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

झारखंडमध्ये विधानसभेसाठी ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यांत मतदान;  २३ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 01:09 IST

झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे

नवी दिल्ली : झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी ३0 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहेत. या नक्षलग्रस्त राज्यामध्ये मतमोजणी २३ डिसेंबर रोजी होईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ३० नोव्हेंबरला होईल. त्यानंतरच्या चार टप्प्यांत ७, १२, १६ व २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या नक्षलग्रस्त राज्यात २०१४ साली झालेली विधानसभा निवडणूकही पाच टप्प्यांत पार (पान ९ वर) पडली होती.आदिवासीबहुल झारखंडमध्ये सध्या भाजप सत्तास्थानी आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांना सत्तेवरून घालविण्यासाठी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चासह अन्य विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. पहिल्या टप्प्यात १३ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात २०, तिसºया टप्प्यात १७, चौथ्या टप्प्यात १५, पाचव्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच, राज्यामध्ये आचारसंहिता त्वरित लागू झाली आहे. महाराष्ट्र, हरयाणामधील विधानसभा निवडणुकांत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झारखंडमध्ये होणार का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत १४ पैकी १0 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

भाजप सत्ता राखणार?झारखंडमध्ये रघुबर दास सरकारने पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांत भाजपच पुन्हा विजयी होणार असल्याचा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. मात्र मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कारकीर्दीत झारखंडचा अजिबात विकास झाला नाही अशी टीका विरोधकांकडून होत असते. रघुबर दास हे झारखंडमध्ये पाच वर्षे पूर्ण करू शकणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी तिथे अस्थिर सरकारे अस्तित्वात होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग