शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 16:47 IST

Jharkhand Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जात असलेल्या महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल आज वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत विधानसभेची निवडणूक होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबरोबरच निकाल जाहीर होणार आहे.

झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. झारखंडमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार झारखंडमधील पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी २८ ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी ही ३० ऑक्टोबर रोजी होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३० ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्य्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ नोव्हेंबरपर्यंत असेल. 

तर झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान हे १३ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मनमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मुख्य लढत होणार आहे.   

टॅग्स :JharkhandझारखंडElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग