शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमार यांनी वक्फ बोर्ड विधेयकावर बॅक गियर टाकला, जेडीयू जेपीसीमध्ये मुस्लिमांबाबत चिंता व्यक्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:24 IST

लोकसभेत वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकला जेडीयू नेते ललन सिंह यांनी समर्थन दिले होते. तर दुसरीतडे त्यांनी आता शिया आणि सन्नी बोर्डच्या नेत्यांची भेट घेतली.

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती संशोधन विधेयक आणले आहे. या विधेयकाला जेडीयू नेते ललन सिंह यांनी समर्थन दिले. दरम्यान, ललन सिंह यांनी काल सोमवारी पाटणा येथे मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

या भेटीनंतर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, जेडीयूचे प्रतिनिधी या विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये मुस्लिमांच्या चिंता मांडतील. सुपौलचे खासदार दिलेश्वर कामैत हे ३१ सदस्यीय जेपीसीमध्ये जेडीयूचे सदस्य आहेत. समितीची पहिली बैठक झाली असून त्यात विरोधी पक्षांनी वक्फ बोर्डात बिगर मुस्लिमांच्या नियुक्तीला एकमताने विरोध केला आहे. पहिल्या बैठकीत कामईत म्हणाले होते की, जेडीयू या विधेयकाबाबत चिंतित असलेल्या मुस्लिमांशी बोलत आहे, त्यामुळे पुढील बैठकीत ते आपले म्हणणे मांडतील.

"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

लोकसभेत या विधेयकावर बोलताना ललन सिंह म्हणाले होते की, विरोधक गुरुद्वारा आणि मंदिराचे उदाहरण देत आहेत पण वक्फ हे धार्मिक स्थळ नसून संस्था आहे. सरकार धर्मात ढवळाढवळ करत नाही, पण संस्थेत भ्रष्टाचार असेल तर हस्तक्षेप का करू शकत नाही, असं ललन सिंह म्हणाले होते. जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या वतीने वक्फ विधेयकाच्या बचावासंदर्भात काही मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी पाटणा येथे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. नितीश कुमार यांच्यासमोर जेडीयूच्या भूमिकेवर मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि विधेयकावर त्यांचे आक्षेप नोंदवले होते. नितीश कुमार यांनी मुस्लिमांना काहीही चुकीचे घडू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.

नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार ललन सिंह यांनी सोमवारी पाटणा जेडीयू कार्यालयात शिया आणि सुन्नी बोर्डाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांनी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीबाबत सविस्तरपणे आपली मते मांडली. ते म्हणाले की, नितीश कुमार नेहमीच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी काम करत आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताला धक्का पोहोचू दिला जाणार नाही. मंत्री विजय चौधरी, जामा खान, महासचिव मनीष वर्मा, शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अफजल अब्बास आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद इर्शादुल्ला या बैठकीत उपस्थित होते.