शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नितीश कुमार यांनी वक्फ बोर्ड विधेयकावर बॅक गियर टाकला, जेडीयू जेपीसीमध्ये मुस्लिमांबाबत चिंता व्यक्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 18:24 IST

लोकसभेत वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकला जेडीयू नेते ललन सिंह यांनी समर्थन दिले होते. तर दुसरीतडे त्यांनी आता शिया आणि सन्नी बोर्डच्या नेत्यांची भेट घेतली.

मोदी सरकारने लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती संशोधन विधेयक आणले आहे. या विधेयकाला जेडीयू नेते ललन सिंह यांनी समर्थन दिले. दरम्यान, ललन सिंह यांनी काल सोमवारी पाटणा येथे मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

या भेटीनंतर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, जेडीयूचे प्रतिनिधी या विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये मुस्लिमांच्या चिंता मांडतील. सुपौलचे खासदार दिलेश्वर कामैत हे ३१ सदस्यीय जेपीसीमध्ये जेडीयूचे सदस्य आहेत. समितीची पहिली बैठक झाली असून त्यात विरोधी पक्षांनी वक्फ बोर्डात बिगर मुस्लिमांच्या नियुक्तीला एकमताने विरोध केला आहे. पहिल्या बैठकीत कामईत म्हणाले होते की, जेडीयू या विधेयकाबाबत चिंतित असलेल्या मुस्लिमांशी बोलत आहे, त्यामुळे पुढील बैठकीत ते आपले म्हणणे मांडतील.

"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

लोकसभेत या विधेयकावर बोलताना ललन सिंह म्हणाले होते की, विरोधक गुरुद्वारा आणि मंदिराचे उदाहरण देत आहेत पण वक्फ हे धार्मिक स्थळ नसून संस्था आहे. सरकार धर्मात ढवळाढवळ करत नाही, पण संस्थेत भ्रष्टाचार असेल तर हस्तक्षेप का करू शकत नाही, असं ललन सिंह म्हणाले होते. जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या वतीने वक्फ विधेयकाच्या बचावासंदर्भात काही मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी पाटणा येथे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. नितीश कुमार यांच्यासमोर जेडीयूच्या भूमिकेवर मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि विधेयकावर त्यांचे आक्षेप नोंदवले होते. नितीश कुमार यांनी मुस्लिमांना काहीही चुकीचे घडू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.

नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार ललन सिंह यांनी सोमवारी पाटणा जेडीयू कार्यालयात शिया आणि सुन्नी बोर्डाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांनी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीबाबत सविस्तरपणे आपली मते मांडली. ते म्हणाले की, नितीश कुमार नेहमीच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी काम करत आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताला धक्का पोहोचू दिला जाणार नाही. मंत्री विजय चौधरी, जामा खान, महासचिव मनीष वर्मा, शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अफजल अब्बास आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद इर्शादुल्ला या बैठकीत उपस्थित होते.