शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

“ते जिथे जातात, तेथील मित्रपक्ष साथ सोडतात”; JDU नेत्याने लगावला राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 11:34 IST

JDU Vs Congress: राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे, असे जदयू नेत्याने म्हटले आहे.

JDU Vs Congress: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे बिहारमध्ये सत्ताबदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे. नितीश कुमार राजीनामा देतील आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतील, असा दावा केला जात आहे. यातच जयदू पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना टोला लगावत सल्ला दिला आहे.

मीडियाशी बोलताना जदयू नेते नीरज कुमार म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे. या यात्रेचे फलित म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ही यात्रा पोहोचल्यावर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाजूला झाल्या. आता ही यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक राजकीय घडामोडी बदलत आहेत. साहजिकच राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे. त्यांच्या रणनीतीत कुठे चूक झाली की, ते जिथे जातात तिथे त्यांचे मित्रपक्ष साथ सोडून जातात, असे नीरज कुमार यांनी म्हटले आहे. 

पुढे जे होईल, त्याचा सामना केला जाईल

बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी यांनी भाष्य केले. आता जनताही असे म्हणत आहे की, त्यांनी असे पलटीमार सरकार पहिल्यांदाच पाहिले आहे. आता काही होईल, ते सर्व जनता पाहील. नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर १५ महिन्यांचे काम कोणीही विसरू शकत नाही. ही आमची उपलब्धी आहे. पुढे काहीही झाले तरी त्याचा सामना केला जाईल, असेही मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यास ते विक्रमी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेत्या रेणू देवी यांचे नाव निश्चित मानले जात आहे, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन सुरू आहे.  

टॅग्स :BiharबिहारRahul Gandhiराहुल गांधीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)