शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जेडीएस लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार, माजी पंतप्रधान देवेगौडा यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:51 IST

देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. २०२४ ची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) गेल्या आठवड्यात दिल्लीत ३८ घटक पक्षांची बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले होते. तर दुसरीककडे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांकडून एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. 

दरम्यान, जनता दल (सेक्युलर)चे अध्यक्ष आणि देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. जेडीएस लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे एचडी देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच, जेडीएस भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया'शी युती करणार नाही, असे यावरून दिसून येते.

"आम्ही चार जागा जिंकू किंवा पाच किंवा सहा, पण आम्ही एकटेच लढू", असे एचडी देवेगौडा म्हणाले. तसेच, "जेडीएस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फक्त त्या भागातच उमेदवार उभे करेल, जिथे पक्ष मजबूत आहे. याबाबत कार्यकर्त्यांशीही चर्चा केली जाईल", असेही एचडी देवेगौडा यांनी सांगितले. दरम्यान, २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटकात भाजप आणि जेडीएस यांच्यात युती होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र, एचडी देवेगौडा यांच्या विधानानंतर भाजपसोबत जेडीएस जाणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि विरोधी पक्ष रणनीती आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिक रोखण्यासाठी कॉंग्रेससह विरोधी पक्षातील नेते बैठका घेत आहेत. गेल्याच आठवड्यात २६ विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही बंगळुरू येथे आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला कसे पराभूत करावयाचे, यावर विचारमंथन केले. तसेच, या बैठकीत विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस' (इंडिया) असे नाव दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 'एनडीए' विरोधात 'इंडिया' अशी होणार, हे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकKarnatakकर्नाटक