शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

मणिपूरमध्ये जवानांवर हल्ला, दोन जवानांना गोळ्या घालून मारले;  पोलिस चौकीवर बॉम्बही फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 11:47 IST

या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.nanatnat

इम्फाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह येथे सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर हल्ला केला. यामध्ये दोन जवान शहीद झाले. याशिवाय कुकी समाजातील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. हल्लेखोर कुकी समाजातील आहेत. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सकाळी मोरेहमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मोरेह एसबीआयजवळील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. दहशतवाद्यांनी तात्पुरत्या कमांडो पोस्टवर गोळीबार केला, ज्यामुळे जवळपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले. सध्या तेंगनौपाल जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी दाेन संशयितांना अटक करण्यात आल्यानंतर ४८ तासांत संशयित कुकी अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीवर हा हल्ला केला आहे. अटक केलेल्यामध्ये एका पक्षातील कार्यकर्त्याचा समावेश आहे.

शस्त्रास्त्र चोरी : सीबीआयकडून पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल मणिपूरमधील जातीय संघर्षाशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआयने मे २०२३ मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची शस्त्रे आणि दारूगोळा लुटल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात नाव असलेल्यांमध्ये मणिपूरच्या प्रतिबंधित पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि कांगलेइपाक कम्युनिस्ट पार्टी (नोयोन)चा माजी सदस्य मोइरांगथेम आनंद सिंह आणि किशम जॉनसन, कोन्थौजम रोमोजीत मेइती, लौक्राकपम माइकल मंगांगचा आणि अथोकपम काजित यांचा समावेश आहे. इम्फाळमधील पांगेई येथील मणिपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस शस्त्रागार ४ मे रोजी लुटले होते. त्यावेळी राज्यातील बहुसंख्य मैतेई समुदाय आणि आदिवासी कुकी यांच्यात जातीय संघर्ष सुरू झाला होता. 

राज्य सरकारने गृहमंत्रालयाकडे हेलिकॉप्टर मागितले - सीमावर्ती शहरातील मोरेहमधील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मणिपूर सरकारने बुधवारी गृहमंत्रालयाकडून हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. - राज्याचे गृह आयुक्त टी. रणजित सिंह यांनी गृहमंत्रालयाचे अतिरिक्त सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोरेह या सीमावर्ती शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ही चिंताजनक आहे. कारण, तेथे सतत गोळीबार होत आहे. - वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. मणिपूर सरकारने गृहमंत्रालयाकडे किमान सात दिवसांसाठी हेलिकॉप्टर मागवले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार